शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

लहरी निसर्गासमोर बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:24 IST

यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत. त्यांना साधा मोबाईल जरी चार्च करायचा असेल तर शहरी ठिकाणी यावे लागत आहे. अशी भयंकर स्थिती निर्माण झालेली असतानाही त्या गावांना अद्याप रोहित्र मिळालेले नाही. त्यातच भयंकर प्रश्न म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे तोंडाशी आलेला घासही जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे सोयाबीन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसाने जमिनीत ओल होती. शिवाय, अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसानेही पाणीपातळी या काळापर्यंत टिकून राहिली होती. त्यामुळेच यंदा रबीच्या क्षेत्रात कमालाची वाढ झाली होती. मात्र केवळ आणि केवळ वीजपुरवठा खंडित केल्यामुळेच शेतकºयांना विहिरीत असलेले पाणीही देता येत नसल्याचे भयंकर चित्र आहे. त्यामुळे शेतकरी ट्रक्टरवर डायनोमा तयार करुन तीन ते चार विद्युत मोटारी चालवित आहेत. तर बहुतांश शेतकरी डिझेल इंजिनने शेती भिजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वातावरणातील बदलामुळे तेही हाती लागते की नाही, याची शाश्वती नाही.लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील ३ ते ४ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पिकांवर याचा परिणाम होत असून सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.या हंगामात फक्त ५२ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे आतापासूनच जलस्तर घटत आहे. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत असल्याने या पिकांवर सेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. काही भागातील कापसावर घाटेअळीही लागली आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक हे सध्या कळी व फुल अवस्थेमध्ये आहे. या पिकांवर शेंगा पोखरणारी हिरवी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी ही अळी रोखण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी सांगितले. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत आहे. त्यामुळे कापसावर मोठ्या प्रमाणावर रोगराई पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभºयावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे व्यवस्थापन कसे कराव, याबाबत कृषी विभागाने पत्रके काढून शेतकºयांपर्यंत पोहाचवले आहे. सध्या रब्बीची पेरणी ८० ते ९० टक्के झाली आहे. काही गावात अजूनही गव्हाची पेरणी सुरू आहे. संरक्षित पाणी शेतकºयांनी खरीप व रबीच्या पिकांना देण्याचे आवाहन करण्यात आले. या हंगामात ५२ टक्केच पाऊस झाल्याने गव्हाची पेरणी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.