शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

लहरी निसर्गासमोर बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:24 IST

यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत. त्यांना साधा मोबाईल जरी चार्च करायचा असेल तर शहरी ठिकाणी यावे लागत आहे. अशी भयंकर स्थिती निर्माण झालेली असतानाही त्या गावांना अद्याप रोहित्र मिळालेले नाही. त्यातच भयंकर प्रश्न म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे तोंडाशी आलेला घासही जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे सोयाबीन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसाने जमिनीत ओल होती. शिवाय, अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसानेही पाणीपातळी या काळापर्यंत टिकून राहिली होती. त्यामुळेच यंदा रबीच्या क्षेत्रात कमालाची वाढ झाली होती. मात्र केवळ आणि केवळ वीजपुरवठा खंडित केल्यामुळेच शेतकºयांना विहिरीत असलेले पाणीही देता येत नसल्याचे भयंकर चित्र आहे. त्यामुळे शेतकरी ट्रक्टरवर डायनोमा तयार करुन तीन ते चार विद्युत मोटारी चालवित आहेत. तर बहुतांश शेतकरी डिझेल इंजिनने शेती भिजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वातावरणातील बदलामुळे तेही हाती लागते की नाही, याची शाश्वती नाही.लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील ३ ते ४ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पिकांवर याचा परिणाम होत असून सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.या हंगामात फक्त ५२ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे आतापासूनच जलस्तर घटत आहे. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत असल्याने या पिकांवर सेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. काही भागातील कापसावर घाटेअळीही लागली आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक हे सध्या कळी व फुल अवस्थेमध्ये आहे. या पिकांवर शेंगा पोखरणारी हिरवी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी ही अळी रोखण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी सांगितले. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत आहे. त्यामुळे कापसावर मोठ्या प्रमाणावर रोगराई पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभºयावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे व्यवस्थापन कसे कराव, याबाबत कृषी विभागाने पत्रके काढून शेतकºयांपर्यंत पोहाचवले आहे. सध्या रब्बीची पेरणी ८० ते ९० टक्के झाली आहे. काही गावात अजूनही गव्हाची पेरणी सुरू आहे. संरक्षित पाणी शेतकºयांनी खरीप व रबीच्या पिकांना देण्याचे आवाहन करण्यात आले. या हंगामात ५२ टक्केच पाऊस झाल्याने गव्हाची पेरणी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.