शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बीडच्या नगराध्यक्षांचे प्रकरण : नगरविकास राज्यमंत्री यांनी तूर्तास कोणताही निर्णय न घेण्याचे अंतरिम आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 14:02 IST

आ. संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम परवानगी दिल्या. त्यामुळे नगर परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.

ठळक मुद्देपुनर्विलोकन अर्ज राज्यमंत्र्यांकडे वर्ग करण्याच्या आदेशाविरुद्ध याचिका

औरंगाबाद : बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रकरणात नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी २१ एप्रिलपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी दिला.याचिकेची पुढील सुनावणी २१ एप्रिलला होणार आहे. डॉ. भारतभूषण यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यवाही करण्याबाबतच्या नोटीसविरुद्ध नगरविकासमंत्री यांच्यासमोर दाखल केलेला पुनर्विलोकन अर्ज राज्यमंत्र्याकडे वर्ग करण्याच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

आ. संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम परवानगी दिल्या. त्यामुळे नगर परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन आ. क्षीरसागर यांच्या तक्रारीबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांना नोटिसा देऊन कार्यवाही सुरु केली. या नोटीसविरुद्ध वरील दोघांनी नगरविकासमंत्री यांच्यासमोर पुनर्विलोकन अर्ज दाखल केले.

नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला. २०१२ ते २०१७ या काळात कार्यरत असलेले मुख्याधिकारी आर्थिक नुकसानीस जबाबदार असून त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी यांनी अहवालात म्हटले आहे. त्यानंतर आ. क्षीरसागर यांनी डॉ. भारतभूषण यांना नगराध्यक्ष म्हणून अपात्र घोषित करावे यासाठी नगरविकासमंत्र्यांसमोर अर्ज दाखल केला. त्यांनी तो राज्यमंत्री यांच्याकडे वर्ग करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयाविरुद्ध डॉ. भारतभूषण यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. शासनातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता डी. आर. काळे यांनी काम पहिले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना