शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कोरोनामुळे सत्र न्यायालय एकाच सत्रात करणार न्यायदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 19:18 IST

१९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत अडीच तासांच्या एकाच सत्रात रिमांड, जामीन अर्ज आणि तातडीच्या फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांवर सुनावणी

ठळक मुद्देकेवळ रिमांड आणि तातडीच्या प्रकरणातच शनिवारी आदेश

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत खबरदारीच्या उपायांसह तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य कनिष्ठ न्यायालये सोमवारपासून अडीच तासांच्या एकाच सत्रात न्यायदान करतील, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी जारी केला आहे.

त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक (रजिस्ट्रार जनरल) एस. जी. दिघे यांनी १६ एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटल्यानुसार वरील सर्व न्यायालये १९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत अडीच तासांच्या एकाच सत्रात रिमांड, जामीन अर्ज आणि तातडीच्या फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांवर सुनावणी घेतील. प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी आवश्यक तेवढे न्यायिक अधिकारी (न्यायाधीश) आणि ५० टक्के न्यायालयीन कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने कर्तव्यावर बोलवावे. त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार न्यायालयीन कामाची वेळ निश्चित करावी. सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच हजर राहावे. प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय मुख्यालयाबाहेर जाऊ नये.

सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असेल, अशा प्रकरणामध्ये निकाल/आदेश द्यावेत. वरील सर्व न्यायालये दर शनिवारी बंद राहतील. केवळ रिमांड आणि तातडीच्या प्रकरणातच शनिवारी आदेश द्यावेत. वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी सुनावणीला गैरहजर राहिल्याच्या कारणावरून या काळात कुठलाही दंडात्मक आदेश करू नये. न्यायालय परिसरातील उपहारगृह आणि वकिलांचा कक्ष (बार रूम) बंद ठेवावेत. केंद्र आणि राज्य शासनाने जारी केलेल्या सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय