शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पेरते व्हा; पण पुरेशा पावसानंतर; जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 18:57 IST

खरिपाच्या पेरणीसाठी साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. खरिपाच्या पेरणीसाठी साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

गेल्या वर्षात बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या पार्श्वभूमीवर जि.प. कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, बाजारात बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीसाठी तयार असली, तरी त्याला पावसाअभावी अद्यापही पाहिजे तसा उठाव नाही. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय प्रामुख्याने कापसाची लागवड करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनाही पाऊस पडल्यानंतरच कपाशीच्या बियाणांची विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. ज्या बियाणांना विक्रीची मान्यता आहे, अशाच बियाणांची विक्री करावी. मान्यता नसलेल्या कंपन्यांच्या आमिषांना बळी पडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत होते; परंतु अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहे. जिल्ह्यात कापूस, मका, उडीद, मूग आदींची पेरणी रखडली आहे. मागील वर्षात झालेला बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहता यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास ३० हजार हेक्टर घट अपेक्षित आहे.जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे असून, गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ती ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र एवढी अपेक्षित आहे.

यंदा खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र असेयंदा खरीप हंगामात लागवडीचे सरासरी क्षेत्र ७ लाख २० हजार हेक्टर एवढे निश्चित करण्यात आले आहे.गेल्या वर्षी ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र. गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड. यंदा १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद