शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पेरते व्हा; पण पुरेशा पावसानंतर; जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 18:57 IST

खरिपाच्या पेरणीसाठी साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. खरिपाच्या पेरणीसाठी साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

गेल्या वर्षात बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या पार्श्वभूमीवर जि.प. कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, बाजारात बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीसाठी तयार असली, तरी त्याला पावसाअभावी अद्यापही पाहिजे तसा उठाव नाही. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय प्रामुख्याने कापसाची लागवड करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनाही पाऊस पडल्यानंतरच कपाशीच्या बियाणांची विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. ज्या बियाणांना विक्रीची मान्यता आहे, अशाच बियाणांची विक्री करावी. मान्यता नसलेल्या कंपन्यांच्या आमिषांना बळी पडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत होते; परंतु अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहे. जिल्ह्यात कापूस, मका, उडीद, मूग आदींची पेरणी रखडली आहे. मागील वर्षात झालेला बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहता यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास ३० हजार हेक्टर घट अपेक्षित आहे.जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे असून, गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ती ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र एवढी अपेक्षित आहे.

यंदा खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र असेयंदा खरीप हंगामात लागवडीचे सरासरी क्षेत्र ७ लाख २० हजार हेक्टर एवढे निश्चित करण्यात आले आहे.गेल्या वर्षी ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र. गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड. यंदा १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद