शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

सावधान ! येथे धोका आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:37 IST

बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान!

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान! बिंदुसरा नदीवरील असणाऱ्या पुलावर धोका आहे. कारण, हा पूल धोकादायक आहे, तर पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने येथे अपघाताची दाट शक्यता आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही अनभिज्ञ आहेत. दरम्यान, याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसणार, हे निश्चित.उत्तर व दक्षिण भारताला जोडण्यासाठी अगदी कमी अंतरात सोयीचा असणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरुन दररोज २० हजारांवर वाहने ये-जा करतात. याच महामार्गावर शहरातून जाणारी बिंदुसरा नदी आहे. या नदीवरील पूल १९३८ साली ब्रिटिशांनी बांधला होता. सुरुवातीला या पुलाची रुंदी ५.५ मीटर एवढी होती. १९८८ मध्ये या पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यात दोन्ही बाजूंनी ४ गर्डर नव्याने बांधण्यात आले. त्यामुळे या पुलाची रुंदी ७.५ मीटर झाली. हा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय ४ मे २०११ रोजी झाला होता; मात्र प्रत्यक्षात जून २०१४ मध्ये त्याची अंमलबजावणी झाली.तेव्हापासून आजपर्यंत या पुलाची केवळ डागडुजी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले. गतवर्षी महाडच्या सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. आयआरबीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ८ आॅगस्ट २०१६ रोजी याची पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय गुणवत्ता तपासणी पथकाने या पुलाची पाहणी केली. यामध्ये हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या पुलावरून अवजड वाहनांसाठी होणारी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे सोलापूरकडे जाणारी अवजड वाहने पाटोदामार्गे वळविण्यात आली. याचा फटका म्हणजे त्यांना ९० किलोमीटर अंतर जास्त कापावे लागले. यामध्ये त्यांना इंधनाचा अधिकचा भुर्दंड व वेळ खर्ची करावा लागला होता. वाहनधारकांच्या या त्रासाची कुणीही दखल घेतली नाही, हे विशेष.कमी उंचीमुळे पर्यायी पूलही धोकादायक !गतवर्षी झालेल्या पावसात बिंदुसरा नदीला पूर आल्याने ब्रिटिशकालीन पुलावरूनही पाणी वाहले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याने तो यावर्षी बंद करण्यात आला. त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून बाजूने केलेल्या रस्त्याची उंची अतिशय कमी असल्याने याला पावसाळ्या धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.