शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

सावधान ! येथे धोका आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:37 IST

बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान!

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान! बिंदुसरा नदीवरील असणाऱ्या पुलावर धोका आहे. कारण, हा पूल धोकादायक आहे, तर पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने येथे अपघाताची दाट शक्यता आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही अनभिज्ञ आहेत. दरम्यान, याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसणार, हे निश्चित.उत्तर व दक्षिण भारताला जोडण्यासाठी अगदी कमी अंतरात सोयीचा असणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरुन दररोज २० हजारांवर वाहने ये-जा करतात. याच महामार्गावर शहरातून जाणारी बिंदुसरा नदी आहे. या नदीवरील पूल १९३८ साली ब्रिटिशांनी बांधला होता. सुरुवातीला या पुलाची रुंदी ५.५ मीटर एवढी होती. १९८८ मध्ये या पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यात दोन्ही बाजूंनी ४ गर्डर नव्याने बांधण्यात आले. त्यामुळे या पुलाची रुंदी ७.५ मीटर झाली. हा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय ४ मे २०११ रोजी झाला होता; मात्र प्रत्यक्षात जून २०१४ मध्ये त्याची अंमलबजावणी झाली.तेव्हापासून आजपर्यंत या पुलाची केवळ डागडुजी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले. गतवर्षी महाडच्या सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. आयआरबीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ८ आॅगस्ट २०१६ रोजी याची पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय गुणवत्ता तपासणी पथकाने या पुलाची पाहणी केली. यामध्ये हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या पुलावरून अवजड वाहनांसाठी होणारी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे सोलापूरकडे जाणारी अवजड वाहने पाटोदामार्गे वळविण्यात आली. याचा फटका म्हणजे त्यांना ९० किलोमीटर अंतर जास्त कापावे लागले. यामध्ये त्यांना इंधनाचा अधिकचा भुर्दंड व वेळ खर्ची करावा लागला होता. वाहनधारकांच्या या त्रासाची कुणीही दखल घेतली नाही, हे विशेष.कमी उंचीमुळे पर्यायी पूलही धोकादायक !गतवर्षी झालेल्या पावसात बिंदुसरा नदीला पूर आल्याने ब्रिटिशकालीन पुलावरूनही पाणी वाहले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याने तो यावर्षी बंद करण्यात आला. त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून बाजूने केलेल्या रस्त्याची उंची अतिशय कमी असल्याने याला पावसाळ्या धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.