शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

तुकड्यांना मान्यता न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे पदवी प्रवेश रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:25 IST

चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने मागणी केलेल्या अतिरिक्त तुकड्या अद्यापपर्यंत मंजूर न झाल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले

मुबीन पटेल ।लोकमत न्यूज नेटवर्कपिशोर : चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने मागणी केलेल्या अतिरिक्त तुकड्या अद्यापपर्यंत मंजूर न झाल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून विद्यापीठाच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येवर अद्याप तोडगा न निघाल्याने हजारो विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक चिंतेत आहेत.कन्नड तालुक्यातील पिशोर गावात तीन कनिष्ठ महाविद्यालये असून दहा कि.मी.च्या परिसरात सहा कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातून दरवर्षी हजारो विद्यार्थी विज्ञान, कला शाखेतून उत्तीर्ण होऊन पदवीसाठी प्रवेश घेतात.पिशोर येथे असलेल्या एच.बी. वरिष्ठ महाविद्यालयात पदवीच्या प्रत्येक शाखेची एक एक तुकडी आहे. या महाविद्यालयातील तुकड्यांची प्रवेश क्षमता १२० असल्याने प्रवेश केव्हाच ‘फुल्ल’ झाले आहेत. आधी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले, मात्र दरवर्षी मिळणारा ५० टक्के वाढीव कोटा कपात करुन यावर्षी फक्त १० टक्केच वाढीव प्रवेश विद्यापीठाने दिले. यामुळे उर्वरित अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रवेशाच्या गोंधळाबाबत अनेक विद्यार्थ्यांनी लोकमत प्रतिनिधीकडे आपली कैफियत मांडली.सदरील प्रवेश प्रक्रियेबाबत संस्थेचे संस्थापक ए. बी. लोखंडे यांनी सांगितले की, आम्ही विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे प्रवेश दिलेले असून जास्तीचे प्रवेश आम्ही देऊ शकत नाही. प्रवेश क्षमता वाढवून देण्यासाठी आम्ही विद्यापीठाला पत्र दिलेले असून अतिरिक्त तुकडीची सुद्धा मागणी केलेली आहे. विद्यापीठाने प्रवेश क्षमता वाढवून दिल्यास किंवा अतिरिक्त तुकडी मंजूर केल्यास उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ.