शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अटीतटीच्या लढतीत ‘उत्कर्ष’ची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान झाले. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण प्रणीत उत्कर्ष पॅनलची सरशी झाली.

ठळक मुद्देविद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणूक : आठपैकी सहा जागांवर वर्चस्व; दोन जागा मंचला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान झाले. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण प्रणीत उत्कर्ष पॅनलची सरशी झाली. भाजपप्रणीत विद्यापीठ विकास मंचला दोन जागांवर समाधान मानावे लागले. इतर प्राधिकरणांच्या नेमणुकींवरही उत्कर्षचेच वर्चस्व राहिले.विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर राखीव प्रवर्गातील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. चार जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात अधिसभेचे सदस्य असलेले आमदार अमरसिंह पंडित, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. अतुल सावे यांच्यासह विविध प्रवर्ग, राज्यपाल, कुलगुरू नियुक्त सदस्यांसह प्रभारी अधिकाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. एकूण ६९ जणांनी मतदान केले.प्राचार्य गटात उत्कर्षचे डॉ.जयसिंग देशमुख यांना पहिल्या फेरीत ३४, मंचचे डॉ. टकले यांना ३० आणि डॉ. प्राप्ती देशमुख यांना ५ मते पडली. यात कोणीही कोटा पूर्ण केला नसल्यामुळे डॉ. देशमुख यांची दुसºया पसंतीची मते मोजली. यातील तीन मते डॉ. जयसिंग देशमुख यांना मिळाली. त्यामुळे त्यांना विजयी घोषित केले. प्राध्यापक गटात उत्कर्षचे डॉ. राजेश करपे यांनी ३५ तर मंचचे डॉ. गोविंद काळे यांना ३४ मते मिळाली. डॉ. करपे यांना अवघ्या एका मताने विजय मिळाला. पदवीधर गटात उत्कर्षचे उमेदवार डॉ. नरेंद्र काळे यांना ३९ मते पडली. तर बंडखोरी केलेले डॉ. संभाजी भोसले यांना ३० मते मिळाली. संस्थाचालक गटात मंच पुरस्कृत उमेदवार संजय निंबाळकर यांना ३७, उत्क र्षचे कपिल आकात यांना २४ आणि अपक्ष भाऊसाहेब राजळे यांना ८ मते मिळाली. यात निंबाळकर यांनी विजयी मताचा कोटा पूर्ण केला. या मतदानानंतर उत्कर्षच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.व्यवस्थापनसह इतर समित्यांवरील विजयी उमेदवारव्यवस्थापन परिषदेचे विजयी उमेदवार उत्कर्षचे डॉ. राजेश करपे, डॉ. जयसिंग देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के आणि सचिन निकम यांचा समावेश आहे. तर मंचकडे पुरस्कृत संजय निंबाळकर, डॉ. हरिदास विधाते यांचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांना कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय स्थायी समितीवर उत्कर्षचे डॉ. भारत खंदारे, डॉ. सतीश दांडगे आणि शेख जहूर यांची बिनविरोध निवड झाली. विद्यापरिषदेवर गोविंद देशमुख, तक्रार निवारण समितीवर डॉ. भगवानसिंग डोभाळ आणि सुनंदा सरवदे यांची निवड केली.कुलसचिवांवर निलंबनाची कारवाईअधिसभेच्या बैठकीला सुरुवात होताच कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे महाराज असा उल्लेख केला. या शब्दावर प्रा. सुनील मगरे यांनी आक्षेप घेऊन बाबासाहेबांना देव, राजा बनविण्याचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. यामुळे कुलसचिवांना निलंबित करण्याची आक्रमकपणे मागणी केली. यावर प्रचंड गदारोळ झाला. शेवटी कुलगुरूंनी डॉ. पांडे यांना निलंबित करण्याची घोषणा करून त्यांना सभागृहाबाहेर काढले. मतदानाच्या वेळी मंचच्या सदस्यांनी डॉ. पांडे यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी लावून धरली. तेव्हा ती मान्य झाल्यामुळे डॉ. पांडे यांनी मतदानाचा अधिकार बजावला. तसेच दुपारच्या सत्रानंतर कामकाजात सहभागही नोंदविला.हा सत्याचा विजयविद्यापीठ कायद्याचा भंग करीत कुलगुरूंनी प्रभारी अधिकाºयांना मतदानाचा अधिकार दिला. राज्य सरकारने नको तेवढा हस्तक्षेप करीत मतदारांवर दबाव टाकला. तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा विजय सत्याचा आहे.- आ. सतीश चव्हाण,उत्कर्ष पॅनलप्रमुखएकमेव सदस्यराज्यात १९७४, १९९४ आणि २०१६ या विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभा, व्यवस्थापन परिषदेवर काम करण्याची संधी मिळणारा एकमेव सदस्य आहे. हा इतिहास घडला आहे. विद्यापीठ विकास मंचने पुरस्कृत केल्यामुळे विजयास हातभार लागला. त्याच वेळी उत्कर्षच्या गटातीलही काही सदस्यांनी सहकार्य केल्यामुळे बहुमत मिळाले.- संजय निंबाळकर, विजयी उमेदवार

टॅग्स :ElectionनिवडणूकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद