शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात कागद संपला, विद्यार्थ्यांना पदव्या मिळेनात; तलाठी भरतीत निवड झालेल्यांची अडचण

By राम शिनगारे | Updated: February 1, 2024 18:52 IST

५ तारखेच्या खरेदी समितीमध्ये निर्णय होणार

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदव्यांच्या छपाईचा कागद संपला आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना अर्ज केल्यानंतरही पदवी मिळत नसल्याची गंभीर चित्र निर्माण झाले आहे. नुकताच तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या युवकांना पदवी अनिवार्य असल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागद नसल्यामुळे पदव्यांचे वाटप थांबल्याच्या घटनाही आता वारंवार घडू लागल्या आहेत.

विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे पदवी मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच सतत कोणत्या ना कोणत्या जागांसाठी अर्ज भरण्यासाठी, निकाल जाहीर झाल्यानंतर ओरिजल पदवीची मागणी केली जाते. त्यामुळे युवक जेव्हा गरज लागेल, तेव्हा पदवीसाठी अर्ज करतात. परीक्षा विभागातही दोन-चार दिवसांत अर्ज केल्यापासून संबंधितांना पदवी देत असते. मात्र, टीईटी पात्र युवकांना शिक्षकपदासाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना पदवीची आवश्यक होती. तेव्हाही कागदाचा पुरवठा कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. पवित्र पोर्टलवर अर्ज करण्याच्या शेवटच्या काही दिवसांत तर विद्यापीठ प्रशासनाला रात्री ११ वाजेपर्यंत परीक्षा भवन उघडे ठेवून पदव्यांचे वाटप करावे लागले होते. त्यासाठी प्रचंड रोषालाही सामोरे जावे लागले होते. त्यातून कोणताही धडा न घेता, पुन्हा आता एकदा पदव्यांचा कागद संपला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून पदवीसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. याविषयी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

खरेदी समितीमध्ये होणार निर्णयविद्यापीठाच्या खरेदी समितीची बैठक ५ जानेवारी रोजी होणार आहे. त्या बैठकीत पदवीच्या कागदाच्या खरेदीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित पुरवठादाराकांडून निविदा मागवून कागदाच्या खरेदीचा आदेश दिला जाईल. या सर्व प्रक्रियेमध्ये १५ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधीही जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यास सुरुवातविद्यापीठात पदवीच्या कागदाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी तात्पुरती पदवी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत, तसेच कागद उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. कागद लवकरच उपलब्ध होऊन पदव्यांची छपाई केली जाईल.- डॉ.भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण