शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दु:खाच्या अंधारात बल्लाळ

By admin | Updated: May 17, 2016 00:04 IST

भोकर : म्हैशाजवळ अपघात होवून तीन दिवस लोटले़ पण अपघाताची झळ पोहोचलेले बल्लाळ मात्र अजूनही दु:खाच्या अंधारात चाचपडत आहे़

भोकर : म्हैशाजवळ अपघात होवून तीन दिवस लोटले़ पण अपघाताची झळ पोहोचलेले बल्लाळ मात्र अजूनही दु:खाच्या अंधारात चाचपडत आहे़ गावात ना चूल पेटतेय, ना हौस-मजा़ मनमिळाऊ स्वभाव असलेल्या एका कुटुंबाची दैवाने वाताहत का करावी, असाच विचार आजही गावकरी करीत असून स्मशानशांतता असलेल्या गावात अधूनमधून केवळ हुंदण्याचा आवाज तेवढा येत आहे़1बल्लाळ गावात जात असतानाच गणपत आडेलू बाजेकर यांचे पत्रे टाकून बांधलेले तीन खोल्यांचे घऱ हे घर आता कुलूपबंद आहे़ या घरात १२ जण आनंदाने जगत असत़ पण सुगी संपली की हे सर्व कुटुंब तेलंगणामधील नवीपेठ येथे वीटभट्टीवर कामाला जायचे़ मृगात हे कुटुंब आपल्या गावी परत यायचे़ तेव्हा घर आनंदाने गजबजून जायचे़ याच गणपत बाजेकर कुटुंबातील ९ जण अपघातात ठार झाले़ तर दिलीप बाजेकर याच्यावर हैदराबाद येथे व राहुल बाजेकर याच्यावर म्हैसा येथे उपचार चालू आहेत़ शुभम हा तीन वर्षांचा चिमुकला सध्या भोकर येथे आजोळी आहे़ बाजेकर यांचे कुटुंब मुळी मनमिळावू स्वभावाचे़ कोणाचं अडलं नडलं तर धावून जाणारे़ शेतीही थोडी गायराऩ पण कामाला मात्र ही मंडळी आदर होती़ कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता मेहनत करून आनंदाने जगणाऱ्या या माणसांवर दैव रुसले आणि होते ते नव्हते झाले़ तीन महिन्यांपूर्वी घराला लावलेले कुलूप पावसाच्या सरी आल्या की उघडणार होते़ पण आता हे कुलूप कोणी उघडावे असाच प्रश्न सर्वांसमोर पडतो आहे़ एका चांगल्या कुटुंबाचा शेवट असा व्हावा याच विचारात गाव वाटचाल करीत आहे़3 दु:खाच्या धक्क्यात असलेले ग्रामस्थ अजूनही चूल पेटविण्याच्या मनस्थितीत नाहीत़ केवळ गावात हुंदण्याचे आवाज येत असून गाव आजही दु:खाच्या अंधारात चाचपडत आहे़ या अपघातात रेणापूर येथील दोघांचा बळी गेला़ हीच परिस्थिती रेणापूरवासियांची आहे़ तर तीन वर्षांचा शुभम आजही मला आई-वडिलांकडे घेवून चला म्हणून रडत आहे़