शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

भगवान बालाजी-देवी पद्मावती विवाह जल्लोषात; हजारो भाविकांच्या साक्षीने औरंगाबादमध्ये पार पडला सोहळा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:12 IST

रोकडिया हनुमान कॉलनीत हजारो भाविकांच्या साक्षीने बालाजी भगवंत व पद्मावती देवीचा नेत्रदिपक विवाह सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंद’ असा गजराने परिसर दुमदुमला होता. 

औरंगाबाद : रोकडिया हनुमान कॉलनीत हजारो भाविकांच्या साक्षीने बालाजी भगवंत व पद्मावती देवीचा नेत्रदिपक विवाह सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंद’ असा गजराने परिसर दुमदुमला होता. 

रोकडिया हनुमान मंदिर व पोवा बालाजी संस्थान ट्रस्टच्यावतीने भगवंतांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोलताशाचा निनादात बालाजी भगवंतांची शोभायात्रा काढण्यात आली होती. रस्तोरस्ती सडा टाकण्यात आला होता. रांगोळी काढण्यात आली होती. सजविलेल्या रथात बालाजी भगवंताची मूर्ती ठेवण्यात आली होती. जागोजागी भाविक भगवंताचे दर्शन घेत होते व पृष्पवृष्टी करण्यात येत होती. सायंकाळी भगवंताची शोभायात्रा रोकडा हनुमान कॉलनीत पोहोचली. ब्रह्मवृंदांनी बालाजीची मूर्ती हातात घेऊन विवाह मंडपात आणली. यानंतर देवी पद्मावतीची मूर्तीही विवाह मंडपात आणल्या गेली. यावेळी हजारो भाविक ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंदा’ असा गजर करीत होते. जयंतीलाल पटेल यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची नाणेतुला करण्यात आली.

विजय कुलकर्णी, राजेंद्र सुर्यवंशी व शेखर जोश्ी यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची शर्करातुला करण्यात आली. वर पिता म्हणून संतोष दंडारे तर वधू पिता म्हणून जगदीश हरसुलकर हे होते. ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणत मंगलाष्टकाला सुरुवात झाली. कोणी अक्षता तर कोणी पुष्पवृष्टी करीत होते. बालाजी व पद्मावती भगवंतांचा विवाह झाला आणि सर्वांनी एकसाथ ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंदा,’ ‘ श्री बालाजी भगवंत की जय’ असा जयघोष करुन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर भगवंतांच्या मूर्तीची विधवत मंदिरात स्थापना करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळा यशस्वीतेसाठी भानजीभाई पटेल, जितमल बगडिया, राजकुमार अग्रवाल, नरेश गुप्ता, सचिन सावजी, अ‍ॅड.रामकिशन बाहेती, जिवराजभाई पटेल, प्रदिप वाघ आदींनी परिश्रम घेतले. पौरिहित्य प्रविण कुलकणी व अरूण डावरे गुरुजी यांनी केले.  पुढील वर्षी गरीबाचे लग्न लावणार पुढील वर्षी भगवान बालाजी व पद्मावती देवीच्या विवाह सोहळ्यात गरीब घरातील वधू-वराचे लग्न लावून देण्यात येणार आहे. सर्व खर्च रोकडिया हनुमान मंदिर व पोवा बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे, अशी घोषणा मंदिराचे विश्वस्त विनोद शेवतेकर यांनी केली. आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.