शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बहुजनांनो, विषमतेला द्या फाटा; संविधानवाद्यांच्या उघडा सत्तेच्या वाटा: भीमराव आंबेडकर 

By विजय सरवदे | Updated: October 2, 2023 17:39 IST

मराठवाडा ही बौद्ध धम्माचा वारसा असलेली ऐतिहासिक भूमी

छत्रपती संभाजीनगर : भारतीय बौद्ध महासभेने देशातील २४ राज्यांत धम्मक्रांतीला गती दिली आहे. हा कारवा जोमाने पुढे जात असून त्यास छुपा विरोध होत आहे. एकोप्याने चालणारा हा देश गेल्या दहा वर्षांत ठरवून बदलण्यात आला. आता बहुजनांना हे चित्र बदलावे लागेल. विषमता पसरविणाऱ्यांना विरोध करा, संविधानाला मानणारे लोक सत्तेत बसविण्याचा आपण सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.

नागसेन वनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात रविवारी बौद्ध धम्म व समता सैनिक दलाचे विभागीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस.के. भंडारे, प्रा. बापू गायकवाड, डी.एम. आचार्य, सुशील वाघमारे, भिकाजी कांबळे, स्वाती शिंदे आदी पदाधिकाऱ्यांची विचारमंचावर उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला ध्वजवंदन व समता सैनिक दलाचे प्रभावी संचलन झाले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून उपासक, उपासिका व समता सैनिक दलाचे जवान हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

आंबेडकर यावेळी म्हणाले, मराठवाडा ही बौद्ध धम्माचा वारसा असलेली ऐतिहासिक भूमी आहे. अजिंठा लेणीला शनिवारी भेट दिल्यानंतर तिथे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो. बुद्ध लेणींमधील अतिक्रमणे रोखा. विदेशातून येणारे ७० टक्के पर्यटक बौद्ध देशातून येतात. विदेशी चलन मिळण्यासाठी हा वारसा जपला पाहिजे. अल्पसंख्याक बौद्ध, जैन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांनी या देशाला भरभरून दिले आहे. बौद्ध धम्माकडे मोठ्या प्रमाणात आदिवासी आकर्षित होत आहेत. ओबीसी देखील मोठ्या संख्येने धर्मांतरीत होत आहेत. त्यामुळेच जनगणना पुढे ढकलली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी विरोध केला आज तिच मंडळी सत्तेत बसली आहे. विषमता ठासून भरली जात असून सत्ताधारी त्यास उत्तेजन देत आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण केले जात आहे. बहुजन शिकूच नये, ही त्यामागची भूमिका आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर शिक्षण आणि कामगारांचा कायदा अमलात आणला जाणार आहे. त्यामुळे ओबीसींना देखील अशा प्रवृत्तीला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल. यावेळी मान्यवरांनी मनोगताद्वारे सत्ता परिवर्तनासाठी सिद्ध होण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार