शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बहुजनांनो, विषमतेला द्या फाटा; संविधानवाद्यांच्या उघडा सत्तेच्या वाटा: भीमराव आंबेडकर 

By विजय सरवदे | Updated: October 2, 2023 17:39 IST

मराठवाडा ही बौद्ध धम्माचा वारसा असलेली ऐतिहासिक भूमी

छत्रपती संभाजीनगर : भारतीय बौद्ध महासभेने देशातील २४ राज्यांत धम्मक्रांतीला गती दिली आहे. हा कारवा जोमाने पुढे जात असून त्यास छुपा विरोध होत आहे. एकोप्याने चालणारा हा देश गेल्या दहा वर्षांत ठरवून बदलण्यात आला. आता बहुजनांना हे चित्र बदलावे लागेल. विषमता पसरविणाऱ्यांना विरोध करा, संविधानाला मानणारे लोक सत्तेत बसविण्याचा आपण सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.

नागसेन वनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात रविवारी बौद्ध धम्म व समता सैनिक दलाचे विभागीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस.के. भंडारे, प्रा. बापू गायकवाड, डी.एम. आचार्य, सुशील वाघमारे, भिकाजी कांबळे, स्वाती शिंदे आदी पदाधिकाऱ्यांची विचारमंचावर उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला ध्वजवंदन व समता सैनिक दलाचे प्रभावी संचलन झाले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून उपासक, उपासिका व समता सैनिक दलाचे जवान हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

आंबेडकर यावेळी म्हणाले, मराठवाडा ही बौद्ध धम्माचा वारसा असलेली ऐतिहासिक भूमी आहे. अजिंठा लेणीला शनिवारी भेट दिल्यानंतर तिथे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो. बुद्ध लेणींमधील अतिक्रमणे रोखा. विदेशातून येणारे ७० टक्के पर्यटक बौद्ध देशातून येतात. विदेशी चलन मिळण्यासाठी हा वारसा जपला पाहिजे. अल्पसंख्याक बौद्ध, जैन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांनी या देशाला भरभरून दिले आहे. बौद्ध धम्माकडे मोठ्या प्रमाणात आदिवासी आकर्षित होत आहेत. ओबीसी देखील मोठ्या संख्येने धर्मांतरीत होत आहेत. त्यामुळेच जनगणना पुढे ढकलली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी विरोध केला आज तिच मंडळी सत्तेत बसली आहे. विषमता ठासून भरली जात असून सत्ताधारी त्यास उत्तेजन देत आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण केले जात आहे. बहुजन शिकूच नये, ही त्यामागची भूमिका आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर शिक्षण आणि कामगारांचा कायदा अमलात आणला जाणार आहे. त्यामुळे ओबीसींना देखील अशा प्रवृत्तीला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल. यावेळी मान्यवरांनी मनोगताद्वारे सत्ता परिवर्तनासाठी सिद्ध होण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार