शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बहुजनांनो, विषमतेला द्या फाटा; संविधानवाद्यांच्या उघडा सत्तेच्या वाटा: भीमराव आंबेडकर 

By विजय सरवदे | Updated: October 2, 2023 17:39 IST

मराठवाडा ही बौद्ध धम्माचा वारसा असलेली ऐतिहासिक भूमी

छत्रपती संभाजीनगर : भारतीय बौद्ध महासभेने देशातील २४ राज्यांत धम्मक्रांतीला गती दिली आहे. हा कारवा जोमाने पुढे जात असून त्यास छुपा विरोध होत आहे. एकोप्याने चालणारा हा देश गेल्या दहा वर्षांत ठरवून बदलण्यात आला. आता बहुजनांना हे चित्र बदलावे लागेल. विषमता पसरविणाऱ्यांना विरोध करा, संविधानाला मानणारे लोक सत्तेत बसविण्याचा आपण सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.

नागसेन वनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात रविवारी बौद्ध धम्म व समता सैनिक दलाचे विभागीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस.के. भंडारे, प्रा. बापू गायकवाड, डी.एम. आचार्य, सुशील वाघमारे, भिकाजी कांबळे, स्वाती शिंदे आदी पदाधिकाऱ्यांची विचारमंचावर उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला ध्वजवंदन व समता सैनिक दलाचे प्रभावी संचलन झाले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून उपासक, उपासिका व समता सैनिक दलाचे जवान हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

आंबेडकर यावेळी म्हणाले, मराठवाडा ही बौद्ध धम्माचा वारसा असलेली ऐतिहासिक भूमी आहे. अजिंठा लेणीला शनिवारी भेट दिल्यानंतर तिथे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो. बुद्ध लेणींमधील अतिक्रमणे रोखा. विदेशातून येणारे ७० टक्के पर्यटक बौद्ध देशातून येतात. विदेशी चलन मिळण्यासाठी हा वारसा जपला पाहिजे. अल्पसंख्याक बौद्ध, जैन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांनी या देशाला भरभरून दिले आहे. बौद्ध धम्माकडे मोठ्या प्रमाणात आदिवासी आकर्षित होत आहेत. ओबीसी देखील मोठ्या संख्येने धर्मांतरीत होत आहेत. त्यामुळेच जनगणना पुढे ढकलली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी विरोध केला आज तिच मंडळी सत्तेत बसली आहे. विषमता ठासून भरली जात असून सत्ताधारी त्यास उत्तेजन देत आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण केले जात आहे. बहुजन शिकूच नये, ही त्यामागची भूमिका आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर शिक्षण आणि कामगारांचा कायदा अमलात आणला जाणार आहे. त्यामुळे ओबीसींना देखील अशा प्रवृत्तीला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल. यावेळी मान्यवरांनी मनोगताद्वारे सत्ता परिवर्तनासाठी सिद्ध होण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार