शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

बागडे नानांचे चॅलेंज आणि खैरे का गुस्सा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:02 IST

——————————— उंट तंबूत शिरला की, तो तंबू व्यापतो. औरंगाबादच्या शिवसेनेचा तंबू अंबादास दानवे या शिवसैनिकाने व्यापला. मी कोणाला घाबरत ...

———————————

उंट तंबूत शिरला की, तो तंबू व्यापतो. औरंगाबादच्या शिवसेनेचा तंबू अंबादास दानवे या शिवसैनिकाने व्यापला. मी कोणाला घाबरत नाही म्हणत ते खैरेंची अस्वस्थता वाढवतात आणि शिवसेनेत आपटबार फुटतात. जिल्हा बँकेची निवडणूक साधून सर्वांनीच बार फोडून घेतले.

——————————

मला तीन प्रश्न पडले आहेत. एक- आ. हरिभाऊ बागडे आणि माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यात देवगिरी किल्ला चढण्याची शर्यत खरोखरच होणार का? आणि होणार असेल तर ती मोफत पाहता येईल का? कारण गेल्या वर्षभरापासून कोरोनाने एवढे पिडले की, आम्ही फक्त जगण्याची शर्यतच पाहतो. त्यापूर्वी बैलाच्या शर्यती, मॅरेथाॅन अशा मैदानी शर्यती होत, त्या आम्ही पाहत असू. (जिलबी, गुलाब जाम खाण्याच्या शर्यतीत आमचा सहभाग असायचा.) म्हणून आमच्यासाठी ही शर्यत सुवर्णसंधी ठरेल. देवगिरीचा फेरफटका होईल. उन्हात राहावे लागणार असल्याने ‘ड’ जीवनसत्त्व मिळेल आणि मोकळ्या हवेत प्राणवायूची पातळीही वाढवून घेता येईल. नानांनी खैरेंना दिलेल्या आव्हानानेच निर्माण झालेला एक प्रश्न म्हणजे नाना खैरेंचा घाम काढतील की, अखेरच्या क्षणी मदतीचा हात पुढे करतील. समजा नानांनी हात पुढे केला तर खैरे हात पकडतील का? आणि खैरेंनी हात पकडला तर अंबादास दानवेंना खैरे कळले नाही, हे खरे मानायचे काय?

आपले नानासुद्धा काहीही प्रश्न विचारतात म्हणे, खैरेंच्या सैनिकी शाळेतून किती सैनिक निर्माण झाले? आता खैरे हेच एक सैनिक असल्याने त्यांच्याकडे पाहता सैनिक तयार करता येत नाही, तो आपोआप तयार होत असतो. खैरेंनी शाळा का काढली, याचा अर्थ असा नव्हे त्यांनी हातात बंदूक घेऊन लेफ्ट-राइट करीत राहावे. पोरांनी यावं, शिकावं, सैनिक व्हावं आणि निघून जावं. हा सरळसोट विचार त्यांनी केला. या शाळेकडे पाहत ते आपल्यातला सैनिक जिवंत ठेवतात. शेवटी काय तर सैनिकीबाणा टिकण्यापेक्षा सैनिक टिकणे महत्त्वाचे. सैन्य उभे करायचे गंमत नाही. नानासाहेब त्यासाठी बाजारबुणगे, कुटुंब कबिला लागतोच. याचे इतिहासात शेकडो दाखले आहेत. ते काही साखर कारखाना, बँक चालवण्यासारखे नाही.

दुसरा प्रश्न- ‘चंद्रकांत खैरे को गुस्सा क्यों आता है?’ अंबादास दानवे म्हटले की, खैरे का उसळतात. परवाही त्यांनी हाच प्रश्न केला. कानामागून आला आणि तिखट झाला, असे त्यांना वाटत असावे. उंट तंबूत शिरला की काय होते, हे आता खैरे अनुभवत आहेत. अंबादास दानवे यांनी जिल्हा व शहर पातळीवरील शिवसेना व्यापली आणि मातोश्रीशी त्यांचा संपर्क असतो. पालकमंत्र्यांसमवेत ते सावलीसारखे असतात. शिवसेनेत आता खैरे-दानवे अशी उघड गटबाजी आहे, ती या स्तरापर्यंत की दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. आमदारकी, जिल्हाप्रमुख या दोन पदांवर दानवे आहेत, तर खैरेंकडे नेतेपदाशिवाय पद नाही. निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागला आहे. ‘असतील शिते तर जमतील भुते’ या म्हणीचा ते पदोपदी अनुभव घेतात. संघटना आणि प्रशासकीय या दोन्ही पातळ्यांवर दानवेंचे अस्तित्व दिसते. नेमके हेच कारण ‘खैरे यांच्या गुस्स्या’चे असावे असे तरी प्राथमिक निदान आहे.

‘देवगिरी’ आणि ‘संभाजी’ असे दोन भक्कम बुरूज बांधून नानांनी आपला किल्ला राखून ठेवल्यामुळे ते देवगिरी चढण्याचे चॅलेंज देऊ शकतात. मी साधा आमदार व जिल्हाप्रमुख आहे. खैरे साहेब तर नेते आहेत, असे म्हणणारे दानवे आता राजकीयदृष्ट्या ‘कळते’ झाले, असेच म्हणावे लागेल.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे या सगळ्यांचा उलगडा झाला. हे सगळेच जण एकमेकांना कसे जोखतात, हे लक्षात आले. निवडणुकीच्या खेळाचे खरे खेळाडू संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे मंत्रीद्वय मात्र या आखाड्यात कोठेच नाहीत. माजी आ. कल्याण काळे हे एका गटाचे नेतृत्व करतात, तेसुद्धा शांत आहेत. खरे राजकारण तिकडे चालू असावे?

- सुधीर महाजन