शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

कोंडी फुटेना; शहरात सुटली कच-याची दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:13 AM

शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. मागील पाच दिवसांपासून साचलेला दोन हजार मेट्रिक टन कचरा आता सडू लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. मागील पाच दिवसांपासून साचलेला दोन हजार मेट्रिक टन कचरा आता सडू लागला आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. या दुर्गंधीमुळे शहरातील १५ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी हाय अलर्ट जारी केला. कच-यापासून रोगराई पसरू नये म्हणून तातडीने ५ टन जंतनाशक पावडर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्लम भागातील नागरिकांसाठी दोन लाख कापडी मास्क वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी मनपाची सर्व ३० आरोग्य केंद्रे सायंकाळीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.नारेगाव येथील शेतक-यांसह बाभूळगाव, पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा आदी भागांत नागरिकांनी तीव्र विरोध केला. कच-याने भरलेले ट्रक मध्यवर्ती जकात नाक्यावर उभे आहेत. या कच-यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, या भागात पाच मिनिटेही थांबणे कठीण झाले आहे. शनिवार ते मंगळवारपर्यंत महापालिकेने कचराच उचलला नाही. अवघा २० ते ३० टक्के कचरा विविध वॉर्डांमध्ये खड्डे करून जिरविण्यात आला. उर्वरित दोन हजार मेट्रिक टन कचरा शहरातील विविध वसाहतींमध्ये पडून आहे. या कच-यातूनही आता दुर्गंधी सुटली आहे. रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांना, परिसरात राहणा-यांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.अशास्त्रीय पद्धतीने कच-यावर प्रक्रिया : कुठेही खड्डे करणे सुरू; आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीऔैरंगाबाद शहरात कच-याची कोंडी निर्माण होताच मनपाकडून विविध वॉर्डांमध्ये मोठमोठे खड्डे करून ओला व सुका कचरा एकत्रित पुरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आणि अशास्त्रीय आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा या क्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञांनी केला आहे. कच-यावर कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट आणि बायोगॅस या तीनच पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते.कच-याच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघत नसल्याने मंगळवारी महापालिकेने शहरातील विविध भागांत खुल्या जागेत खड्डे करून ओला व सुका कचरा पुरण्याचे काम केले. या पद्धतीवर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.कचरा वेचक क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी सांगितले की, कच-यावर कंपोस्ट प्रक्रिया करण्यात येते. याला ४० दिवस लागतात. वर्मी कंपोस्ट पद्धतीत दहा दिवस लागतात. झटपट प्रक्रिया करणारी पद्धत म्हणजे बायोगॅस होय. खड्डे करून कचरा पुरल्याने नंतर तेथून गॅस बाहेर येईल. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. महानगरपालिकेने कचरावेचकांना सोबत घेऊन ओला व सुका कचरा वेगळा करावा, नागरिकांना सोबत घेऊन ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने ठिकठिकाणी प्रक्रिया करावी. एवढे करूनही कच-याचा प्रश्न सुटणार नाही. शहरात जमा होणारा कचरा जवळपास ५०० मेट्रिक टन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघणाºया कच-यावर प्रक्रिया कशी होणार, त्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.