शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोंडी फुटेना; शहरात सुटली कच-याची दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:13 IST

शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. मागील पाच दिवसांपासून साचलेला दोन हजार मेट्रिक टन कचरा आता सडू लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. मागील पाच दिवसांपासून साचलेला दोन हजार मेट्रिक टन कचरा आता सडू लागला आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. या दुर्गंधीमुळे शहरातील १५ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी हाय अलर्ट जारी केला. कच-यापासून रोगराई पसरू नये म्हणून तातडीने ५ टन जंतनाशक पावडर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्लम भागातील नागरिकांसाठी दोन लाख कापडी मास्क वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी मनपाची सर्व ३० आरोग्य केंद्रे सायंकाळीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.नारेगाव येथील शेतक-यांसह बाभूळगाव, पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा आदी भागांत नागरिकांनी तीव्र विरोध केला. कच-याने भरलेले ट्रक मध्यवर्ती जकात नाक्यावर उभे आहेत. या कच-यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, या भागात पाच मिनिटेही थांबणे कठीण झाले आहे. शनिवार ते मंगळवारपर्यंत महापालिकेने कचराच उचलला नाही. अवघा २० ते ३० टक्के कचरा विविध वॉर्डांमध्ये खड्डे करून जिरविण्यात आला. उर्वरित दोन हजार मेट्रिक टन कचरा शहरातील विविध वसाहतींमध्ये पडून आहे. या कच-यातूनही आता दुर्गंधी सुटली आहे. रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांना, परिसरात राहणा-यांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.अशास्त्रीय पद्धतीने कच-यावर प्रक्रिया : कुठेही खड्डे करणे सुरू; आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीऔैरंगाबाद शहरात कच-याची कोंडी निर्माण होताच मनपाकडून विविध वॉर्डांमध्ये मोठमोठे खड्डे करून ओला व सुका कचरा एकत्रित पुरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आणि अशास्त्रीय आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा या क्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञांनी केला आहे. कच-यावर कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट आणि बायोगॅस या तीनच पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते.कच-याच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघत नसल्याने मंगळवारी महापालिकेने शहरातील विविध भागांत खुल्या जागेत खड्डे करून ओला व सुका कचरा पुरण्याचे काम केले. या पद्धतीवर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.कचरा वेचक क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी सांगितले की, कच-यावर कंपोस्ट प्रक्रिया करण्यात येते. याला ४० दिवस लागतात. वर्मी कंपोस्ट पद्धतीत दहा दिवस लागतात. झटपट प्रक्रिया करणारी पद्धत म्हणजे बायोगॅस होय. खड्डे करून कचरा पुरल्याने नंतर तेथून गॅस बाहेर येईल. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. महानगरपालिकेने कचरावेचकांना सोबत घेऊन ओला व सुका कचरा वेगळा करावा, नागरिकांना सोबत घेऊन ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने ठिकठिकाणी प्रक्रिया करावी. एवढे करूनही कच-याचा प्रश्न सुटणार नाही. शहरात जमा होणारा कचरा जवळपास ५०० मेट्रिक टन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघणाºया कच-यावर प्रक्रिया कशी होणार, त्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.