शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

‘लेकीवाचून घराले बाप्पा घरपण नाही’

By admin | Updated: September 14, 2014 23:36 IST

वसमत : येथे प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने काव्य- मैफील घेण्यात आली. काव्य मैफिलीची सुरूवात विष्णू थोरे यांच्या कवितेने झाली.

वसमत : येथे प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने काव्य- मैफील घेण्यात आली. काव्य मैफिलीची सुरूवात विष्णू थोरे यांच्या कवितेने झाली. स्त्रीभूुण हत्या, हुंडाबळीच्या काळात लेकीचे महत्व थोरे यांनी आपल्या कवितेतून स्पष्ट केले. ‘ जरी संसार इस्तव लेक सरपण नाहीलेकी वाचून घराले बाप्पा घरपण नाही’कवी तुकाराम धांडे यांनी आपल्या रान कवितांच्या माध्यमातून निसर्गाचे चित्र रसिकांसमोर उभे करत अनेक सामाजिक, कौटुंबिक व पर्यावरणाच्या प्रश्नांना हात घालत रसिकांशी थेट संवाद साधला. ‘वाटणी’ या कवितेतून त्यांनी वाटणी सारख्या कटू प्रसंगातील दोन भावांचा परस्पर जिव्हाळा व प्रेम व्यक्त केले. ‘आपण दोघं जिवंत असेपर्यंततू मला आणि मी तुलातुझ्या दुखण्याखुपण्यात माझी मांडी तुलामी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला’यासोबतच तुकाराम धांडे यांनी तिसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली ‘रानवेडी’ ही कविता सादर केली. ‘तुकोबा आणि आजोबा’ या कवितेलाही रसिकांनी चांगलीच दाद दिली. तर ‘भूगोल’ या कवितेतून विकास प्रक्रियेचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी ‘हा भुगोल वाचवायलाच पाहिजे’ हा दिलेला संदेश रसिकांना अंतर्मुख करावयाला लावणारा होता. परभणी येथील कवी संतोष नारायणकर यांनी आपल्या कवितेतून एकत्र कुटुंब पद्धतीतील नातेसंबंधावर भाष्य केले. ‘तडतडणारे ऊन साहतो मराठवाडातरीही आनंदाची गाणी गातो मराठवाडा’या ओळीतून मराठवाड्याची रसिकता त्यांनी व्यक्त केली. तर ‘ देवा दूध सांडले की धुके बाई गंढग घेती डोंगराला झोके बाई गं’ अशा काव्यपंक्तींचा आधार घेत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात झालेल्या मैफिलीस तुकाराम धांडे (इगतपुरी), विष्णू थोरे (चांदवड, नाशिक), नारायण पुरी (औरंगाबाद), संतोष नारायणकर (परभणी) व केशव खटींग यांचा सहभाग होता. प्रास्ताविक यल्लाप्पा मीटकर यांनी केले. सूत्रसंचालक प्रा. महेश अचिंतलवार यांनी रंगत वाढवली. यावेळी गटशिणाधिकारी विठ्ठल भुसारे, अ‍ॅड. राजा कदम, प्रकाश इंगळे यांनी पुढील वर्षी प्राचार्य पतंगे यांच्या नावाने राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार देण्याचा व रावसाहेब पतंगे स्मृती गौरवग्रंथाचे संपादन करण्याचा संकल्प जाहीर केला. उपप्राचार्य बी.डी. कदम यांनी अध्यक्षीय समारोपात पुढील वर्षी एक वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठाणचे प्रकाश इंगळे, प्रवीण शेळके, गजानन पाठक केशव खटींग, मनोज चव्हाण, सीताराम म्यानेवार, शिवकुमार पांचाळ, शेख इम्रान, अनिल जाधव, प्रवीण नादरे, मुंजाळ आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)