शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जागृतीमुळे लोकशाही परिपक्व- सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:24 IST

सध्या जग जवळ आलं आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारताहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होते आहे. राजकारणी कालसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व प्रसिद्ध लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्या जग जवळ आलं आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारताहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होते आहे. राजकारणी कालसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व प्रसिद्ध लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार वितरण सोमवारी मसापच्या ना. गो. नांदापूरकर सभागृहात झाले. यात यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार प्रा.सुरेश द्वादशीवार यांच्या ‘युगांतर’ ग्रंथास आणि नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यांना विभागून देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रत्येकी ११ हजार रुपये रोख देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, प्रा.मनोहर जाधव आणि प्रा.जयंत शेवतेकर, डॉ. दादा गोरे उपस्थित होते. यावेळी प्रा. द्वादशीवार म्हणाले, राजकारणातली माणसे चांगली नसतात हे चुकीचे आहे. राजकारणी, साहित्यिक या मानवनिर्मित भिंती आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, सरदार वल्लभभाई पटेल हे राजकारण्यांपेक्षा अप्रतिम लेखक होते. मधल्या काळातील मुख्यमंत्री आठवत नाहीत, पण लेखकात कोणत्याही प्रकारच्या भिंती नसतात. कुळ, जात, धर्म, देश याबद्दलच्या निष्ठा या जन्मदत्त असतात. त्याविषयी अभिमान बाळगण्याचे कारण नाही. विचारपूर्वक बाळगलेल्या मूल्यांबाबत आपण श्रद्धा बाळगली पाहिजे, असेही द्वादशीवार यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त रंगकर्मी प्रा. दिलीप घारे आणि प्रा.यशवंत देशमुख यांनीही सत्काराला उत्तर दिले. तत्पूर्वी डॉ. मनोहर जाधव यांनी ‘युगांतर’ ग्रंथावर भाष्य केले. तर डॉ. जयंत शेवतेकर यांनी प्रा. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यांच्या नाट्यकार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला साहित्यिक, लेखक, कवी, रसिक उपस्थित होते.आता पुतळ्यांची भीती वाटू लागली : कोत्तापल्लेडॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, सध्या देशात सर्वत्र अस्वस्थता असल्यामुळे वर्तमान कठीण बनले आहे. आता पुतळ्यांचीही भीती वाटू लागली आहे.तामिळनाडूतील रामस्वामी नायकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे पाडण्यात येत आहेत. यात आणखी महात्मा फुले यांचा समावेश झालेला नाही. नवा भारत घडविण्यासाठीच संविधान आले. यानुसार आपल्याला जावे लागणार आहे. या काळात सुरेश द्वादशीवार, प्रा. दिलीप घारे आणि प्रा. देशमुख यांच्यासारख्यांचे कार्य महत्त्वाचे ठरते, असेही डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले.