शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

जागृतीमुळे लोकशाही परिपक्व- सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:24 IST

सध्या जग जवळ आलं आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारताहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होते आहे. राजकारणी कालसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व प्रसिद्ध लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्या जग जवळ आलं आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारताहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होते आहे. राजकारणी कालसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व प्रसिद्ध लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार वितरण सोमवारी मसापच्या ना. गो. नांदापूरकर सभागृहात झाले. यात यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार प्रा.सुरेश द्वादशीवार यांच्या ‘युगांतर’ ग्रंथास आणि नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यांना विभागून देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रत्येकी ११ हजार रुपये रोख देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, प्रा.मनोहर जाधव आणि प्रा.जयंत शेवतेकर, डॉ. दादा गोरे उपस्थित होते. यावेळी प्रा. द्वादशीवार म्हणाले, राजकारणातली माणसे चांगली नसतात हे चुकीचे आहे. राजकारणी, साहित्यिक या मानवनिर्मित भिंती आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, सरदार वल्लभभाई पटेल हे राजकारण्यांपेक्षा अप्रतिम लेखक होते. मधल्या काळातील मुख्यमंत्री आठवत नाहीत, पण लेखकात कोणत्याही प्रकारच्या भिंती नसतात. कुळ, जात, धर्म, देश याबद्दलच्या निष्ठा या जन्मदत्त असतात. त्याविषयी अभिमान बाळगण्याचे कारण नाही. विचारपूर्वक बाळगलेल्या मूल्यांबाबत आपण श्रद्धा बाळगली पाहिजे, असेही द्वादशीवार यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त रंगकर्मी प्रा. दिलीप घारे आणि प्रा.यशवंत देशमुख यांनीही सत्काराला उत्तर दिले. तत्पूर्वी डॉ. मनोहर जाधव यांनी ‘युगांतर’ ग्रंथावर भाष्य केले. तर डॉ. जयंत शेवतेकर यांनी प्रा. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यांच्या नाट्यकार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला साहित्यिक, लेखक, कवी, रसिक उपस्थित होते.आता पुतळ्यांची भीती वाटू लागली : कोत्तापल्लेडॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, सध्या देशात सर्वत्र अस्वस्थता असल्यामुळे वर्तमान कठीण बनले आहे. आता पुतळ्यांचीही भीती वाटू लागली आहे.तामिळनाडूतील रामस्वामी नायकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे पाडण्यात येत आहेत. यात आणखी महात्मा फुले यांचा समावेश झालेला नाही. नवा भारत घडविण्यासाठीच संविधान आले. यानुसार आपल्याला जावे लागणार आहे. या काळात सुरेश द्वादशीवार, प्रा. दिलीप घारे आणि प्रा. देशमुख यांच्यासारख्यांचे कार्य महत्त्वाचे ठरते, असेही डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले.