शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

फुलांचा खर्च टाळून मदत सौर ऊर्जा प्रकल्प होणार

By admin | Updated: October 17, 2016 01:20 IST

औरंगाबाद : १ मे २०१७ पर्यंत देशातील ७ हजार ४२६ गावांत वीजपुरवठा करण्यात येईल. आजवर १० हजार ४१२ गावे अंधारमुक्त झाल्याचा दावा

औरंगाबाद : १ मे २०१७ पर्यंत देशातील ७ हजार ४२६ गावांत वीजपुरवठा करण्यात येईल. आजवर १० हजार ४१२ गावे अंधारमुक्त झाल्याचा दावा केंद्रीय नविनीकरण ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १ हजार दिवसांत ग्रामीण भारत अंधारमुक्त करण्याचे धोरण असून, त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यात लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची हमी त्यांनी दिली.भारतातील १८ हजार ४५२ गावांमध्ये वीज नव्हती. २००९ पासून २०१४ पर्यंत उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांत १०० गावांमध्ये वीजपुरवठा झाला. दुर्गम भागांतील गावांना वीजपुरवठा करणे हे अशक्यप्राय होते. परंतु या ७०० दिवसांच्या कारभारात केंद्र शासनाने देशातील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये वीजपुरवठा केला आहे. देशातील ६१४ गावे अशी आहेत की, जेथे नागरी वास्तव्य नाही. तर काही ठिकाणी जंगली, पहाडी परिसरामुळे वीजपुरवठा करण्यात अडथळे येतात, असे गोयल यांनी नमूद केले. यावेळी एसजेव्हीएनचे अध्यक्ष आर. एन. मिश्रा, आ. अतुल सावे, डॉ. अनंत पंढरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, किशनचंद तनवाणी, संजय केणेकर यांची उपस्थिती होती. मराठवाड्यात सौर ऊर्जा प्रकल्पमराठवाड्यात पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत पूर्ण आढावा घेतलेला नाही. परंतु सौरऊर्जा प्रकल्पासाठी विभागात शासनाने (पान २ वर)औरंगाबाद : भारतीय युवकांनी त्यांच्यातील क्षमता नवसंशोधनासाठी प्रभावीपणे वापरल्यास देश निश्चित महासत्ता होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी येथे व्यक्त केला. तरुण उद्योजकांनी अनुदानाऐवजी नवसंशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले. चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) तिसऱ्या सीईओ फोरमचे उद्घाटन गोयल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा, सचिव दुष्यंत पाटील, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, राम भोगले, सी. पी. त्रिपाठी, श्रीराम नारायणन, उमेश दाशरथी, (पान २ वर)भीषण दुष्काळी परिस्थितीत लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा निर्णय हा ‘इनोव्हेशन’चे उदाहरणच आहे. सूरतचे नियोजन करणारे सनदी अधिकारी म्हणून श्रीनिवास ओळखले जातात. ४दिल्ली मेट्रोचे जनक म्हणून श्रीधरन यांची ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, हे सर्व ‘इनोव्हेशन’मध्येच मोडते. सुरुवातीला अशक्य वाटणारी गोष्ट सकारात्मक विचार व नवकल्पनांमुळे सहज साध्य होते, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.कोणत्याही कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छांवर मोठा खर्च होत असतो. हा खर्च टाळून खर्चाची रक्कम सामाजिक संस्थेस प्रदान करण्याचा उपक्रम ‘सीएमआयए’ने हाती घेतला आहे. दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या नवजीवन सोसायटीच्या अध्यक्षा नलिनी शहा यांना गोयल यांच्या हस्ते यावेळी मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.