लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी २०१ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के शांततेत मतदान झाले. मतदानासाठी ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. काही ठिकाणी पाऊस आल्याने मतदानावर थोडा परिणाम झाला. काही ठिकाणी मशीनमध्ये बिघाड व वीज खंडित झाल्याने अडथळा आला होता. सिल्लोड तालुक्यात ८०.१८ टक्के, कन्नड-७६.०५, पैठण-८९, गंगापूर-८६.५३, वैजापूर-८२.९९, खुलताबाद-८८.३९, सोयगाव-८२.०३, फुलंब्री-८८ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होईल.
२०१ ग्रा.पं.साठी जिल्ह्यात सरासरी ८०% मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:39 IST