शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

स्वयंचलित हवामान केंद्रांचे भिजत घोंगडे

By admin | Updated: August 29, 2014 01:26 IST

भास्कर लांडे , हिंगोली केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘स्वयंचलित हवामान केंद्रास’ अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. तीन वर्षांपूर्वी घोषणा करून गावोगावी जागा तेवढी आडून धरली.

भास्कर लांडे , हिंगोलीकेंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘स्वयंचलित हवामान केंद्रास’ अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. तीन वर्षांपूर्वी घोषणा करून गावोगावी जागा तेवढी आडून धरली. आजघडीला मराठवाड्यात सर्वत्र केंद्र सुरू झाले असताना आयुक्त कार्यालयाकडे मेल, फॅक्स आणि फाईल जावूनही या केंद्राचे भिजत घोंगडे कायम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे हा प्रकार घडत आहे. देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला स्वंयचलित हवामान केंद्र राज्यात सर्वत्र राबविण्यात आला. जिल्ह्यात त्यानुसार ४७ ठिकाणांची निवड सुरूवातीला करण्यात आली होती. अखेरीस ३० हवामान केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. कृषी विभागाने महसूल मंडळनिहाय जागाही घेतली. दरम्यान ,आयुक्तांकडे या केंद्राची माहिती ई-मेल, फॅक्स आणि फाईलद्वारे देण्यात आली. आज त्याला तीन वर्षांचा कालवाधी लोटला तरी या केंद्रांचे भिजत घोंगडे कायम आहे. केंद्रासाठी निधी मिळत नाही, अशीही काही समस्या नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या निधीची गरज नाही. जिल्हा कार्यालयास याबाबत पूर्ण अधिकार असताना याबद्दल अधिकाऱ्यांची अनास्था दिसून येते. आजमितीला या केंद्रांचा विसरच कार्यालयास पडला. परिणामी, असे केंद्र स्थापन करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याची धडपड दिसून येत नाही. तीन वर्षांपासून जरासीही हालचाल कृषी विभागाने केलेली नाही. दरम्यान, दोन कृषी अधिकारी आणि दोन तंत्र अधिकारी येवून गेले. वर्षभरापासून आलेल्या शिवाजी पवार यांनाही या केंद्राचा विसर पडला. विकासात भर घालणाऱ्या या प्रकल्पाविषयी एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांना कोणी जाबही विचारत नाही. मुळात उत्पादकांच्या हिताविषयी कोणीही अग्रही भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी नाही. सस्त लोकप्रतिनिधी आणि धिम्न प्रशासानामुळे जिल्ह्यातील कृषी विकास खुंटल्याचे ‘कृषी दिनानिमित्त’ म्हणावे लागेल.