शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आज होणार औरंगाबादच्या ‘समांतर’चा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:12 IST

समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवारी दिले. त्यामुळे महापालिका पदाधिकारी समांतरच्या बाजूने निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने लादलेल्या जाचक अटी शर्ती सर्वसाधारण सभेत किती अमान्य करण्यात येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमनपा सर्वसाधारण सभा : एकाच विषयासाठी सहाव्यांदा सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवारी दिले. त्यामुळे महापालिका पदाधिकारी समांतरच्या बाजूने निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने लादलेल्या जाचक अटी शर्ती सर्वसाधारण सभेत किती अमान्य करण्यात येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.मागील दोन महिन्यांपासून महापालिकेत समांतर जलवाहिनीच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेना समांतरचा ठराव मंजूर करण्यास अनुकूल आहे. भाजपची काहीच हरकत नाही. विरोध फक्त एमआयएमचा सुरू आहे. मागील पाच सर्वसाधारण सभेत समांतरच्या मुद्यावर सभेत चर्चेला सुरुवातच झाली नाही. सोमवारी सकाळी ११.३० वाजता सभेला सुरुवात झाल्यावर सर्व पक्षांचे गटनेते या मुद्यावर भूमिका मांडतील. त्यानंतर नगरसेवक चर्चेत सहभागी होणार आहेत. सभेचे मत आणि पक्षाचा आदेश मिळाल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.कंपनीने लादलेल्या अटीमनपाने एक महिन्यात पाणीपुरवठा योजना कंपनीकडे हस्तांतरित करावी.करार झाल्यानंतर ४ वर्षे पाणीपट्टीत वाढ होणार नाही. त्यानंतर दरवर्षी १० टक्के वाढ होईल.चार वर्षांनंतर नळांना मीटर बसविण्यात येईल.कंपनीला वर्कआॅर्डर देताच ५० कोटी रुपये जुनी थकबाकी द्यावी.१ हजार कोटींचे कर्ज घेण्यासाठी मनपाने बँक गॅरंटी घ्यावी. मनपाच्या मालमत्ता गहाण ठेवण्याची मुभा द्यावी.१ हजार कोटींच्या प्रकल्पात जीएसटी रक्कम मनपानेच द्यावी.पाणीपट्टीतील दरवाढ न परवडणारीयुटिलिटी कंपनी ३० सप्टेंबर २०२२ नंतर पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के दरवाढ करणार आहे. सध्या ४ हजार ५० रुपये मनपाकडून पाणीपट्टी वसूल करण्यात येते. कंपनी दहा वर्षे पाणीपुरवठा योजना चालविणार आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातून १०० कोटी रुपये दरवर्षी कंपनी वसूल करणार आहे. योजनेसाठी लागणारी ८० टक्के रक्कम यातून वसूल करणार आहे. याशिवाय मनपा कंपनीला दरवर्षी योजना चालविण्यासाठी स्वतंत्रपणे ६० कोटी रुपये देणार आहे. चारही बाजूने कंपनीचाच फायदा बघितला जात आहे. औरंगाबादकरांना संभाव्य दरवाढ न परवडणारी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाwater transportजलवाहतूक