शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार औरंगाबादच्या ‘समांतर’चा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:12 IST

समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवारी दिले. त्यामुळे महापालिका पदाधिकारी समांतरच्या बाजूने निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने लादलेल्या जाचक अटी शर्ती सर्वसाधारण सभेत किती अमान्य करण्यात येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमनपा सर्वसाधारण सभा : एकाच विषयासाठी सहाव्यांदा सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवारी दिले. त्यामुळे महापालिका पदाधिकारी समांतरच्या बाजूने निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने लादलेल्या जाचक अटी शर्ती सर्वसाधारण सभेत किती अमान्य करण्यात येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.मागील दोन महिन्यांपासून महापालिकेत समांतर जलवाहिनीच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेना समांतरचा ठराव मंजूर करण्यास अनुकूल आहे. भाजपची काहीच हरकत नाही. विरोध फक्त एमआयएमचा सुरू आहे. मागील पाच सर्वसाधारण सभेत समांतरच्या मुद्यावर सभेत चर्चेला सुरुवातच झाली नाही. सोमवारी सकाळी ११.३० वाजता सभेला सुरुवात झाल्यावर सर्व पक्षांचे गटनेते या मुद्यावर भूमिका मांडतील. त्यानंतर नगरसेवक चर्चेत सहभागी होणार आहेत. सभेचे मत आणि पक्षाचा आदेश मिळाल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.कंपनीने लादलेल्या अटीमनपाने एक महिन्यात पाणीपुरवठा योजना कंपनीकडे हस्तांतरित करावी.करार झाल्यानंतर ४ वर्षे पाणीपट्टीत वाढ होणार नाही. त्यानंतर दरवर्षी १० टक्के वाढ होईल.चार वर्षांनंतर नळांना मीटर बसविण्यात येईल.कंपनीला वर्कआॅर्डर देताच ५० कोटी रुपये जुनी थकबाकी द्यावी.१ हजार कोटींचे कर्ज घेण्यासाठी मनपाने बँक गॅरंटी घ्यावी. मनपाच्या मालमत्ता गहाण ठेवण्याची मुभा द्यावी.१ हजार कोटींच्या प्रकल्पात जीएसटी रक्कम मनपानेच द्यावी.पाणीपट्टीतील दरवाढ न परवडणारीयुटिलिटी कंपनी ३० सप्टेंबर २०२२ नंतर पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के दरवाढ करणार आहे. सध्या ४ हजार ५० रुपये मनपाकडून पाणीपट्टी वसूल करण्यात येते. कंपनी दहा वर्षे पाणीपुरवठा योजना चालविणार आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातून १०० कोटी रुपये दरवर्षी कंपनी वसूल करणार आहे. योजनेसाठी लागणारी ८० टक्के रक्कम यातून वसूल करणार आहे. याशिवाय मनपा कंपनीला दरवर्षी योजना चालविण्यासाठी स्वतंत्रपणे ६० कोटी रुपये देणार आहे. चारही बाजूने कंपनीचाच फायदा बघितला जात आहे. औरंगाबादकरांना संभाव्य दरवाढ न परवडणारी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाwater transportजलवाहतूक