शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

औरंगाबादची प्रतिमा कचरा प्रकरणामुळे झाली मलिन; उद्योगविश्वातून प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 13:17 IST

शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला आलेले अपयश हे या शहराच्या प्रतिमेला हानिकारक असल्याच्या प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून उमटल्या आहेत.

औरंगाबाद : शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला आलेले अपयश हे या शहराच्या प्रतिमेला हानिकारक असल्याच्या प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून उमटल्या आहेत. नव्याने गुंतवणूक होण्यावरदेखील या मुद्याचा परिणाम होऊ शकतो, अशीही शक्यता काहींनी वर्तविली.

२१ व्या दिवशीही शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेसह शासनाने नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला काहीही करता आले नाही. देश-विदेशात औरंगाबाद शहराची अस्वच्छ अशी प्रतिमा निर्माण झाली असून, याचे पडसाद वेगवेगळ्या पातळीवर उमटू शकतात, अशी भीती उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

२१ दिवसांपासून शहर चर्चेतउद्योजक तथा मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, कचरा प्रकरणामुळे औरंगाबाद शहर मागील २१ दिवसांपासून चर्चेत राहिले ते के वळ कचर्‍याच्या विल्हेवाटीवरून. त्यामुळे शहराची प्रतिमा अस्वच्छ शहर म्हणून झाली आहे. त्याचे उद्योग, पर्यटनावर थेट परिणाम सध्या दिसत नसले तरी शहराची प्रतिमा मात्र डागळली आहे. 

गुंतवणुकीवर परिणाम होईलनव्याने गुंतवणूक करणारे उद्योग शहराची पर्यावरण साखळीदेखील विचारात घेत आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात कचर्‍यासारख्या ज्वलनशील प्रश्नावर उपाय शोधण्यात शासकीय आणि राजकीय पातळीवरील यंत्रणांना येणारे अपयश हे निश्चित परिणामकारक आहे. शहराची प्रतिमा डागळली असून, पर्यटनाच्या राजधानीचे जगभर नाक गेले आहे. औद्योगिक वसाहतीतील स्वच्छतेकडे मनपा अजूनही पूर्णपणे लक्ष देऊ शकलेली नाही, असे मत उद्योजक अर्जुन गायके यांनी व्यक्त केले.

उद्योगांकडून बोध घ्यावामनपासह इतर यंत्रणांनी उद्योगांकडून बोध घेतला पाहिजे. सर्व स्तरावर संघर्ष करून उद्योग सुरळीत चालविले जातात. मग पालिका सर्व सुविधा देण्यासाठी सुरळीतपणे का चालविली जात नाही. कचर्‍याच्या प्रश्नामुळे  उद्योगांवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही; परंतु औद्योगिक वसाहतींच्या स्वच्छतेकडे पालिका पाहिजे तसे लक्ष देत नाही. औद्योगिक वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी उद्योजक आपापल्या परीने प्रयत्न करतात. कचर्‍याच्या प्रक्रियेबाबत जगभरातील प्रयोग समजून घेतले पाहिजेत, असे मत मसिआ संघटनेचे अध्यक्ष सुनील किर्दक यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद