शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

औरंगाबाद मनपाला ‘टेक ईट ईझी’ धोरण पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:11 IST

शहरातील कचराकोंडीला आज २० दिवस होतील. आतापर्यंत महापालिका प्रशासनाला कचरा प्रश्नावर तोडगा काढता आला नाही.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला आज २० दिवस होतील. आतापर्यंत महापालिका प्रशासनाला कचरा प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. शहराच्या आसपास कुठेही कचरा टाकला, तर नागरिक अंगावर येत आहेत. ७ ते ८ हजार मेट्रिक टन कचरा शहरातील विविध रस्त्यांवर साचला आहे. कचर्‍याचा प्रश्न थेट खंडपीठात पोहोचला. मंगळवारी खंडपीठाने नारेगाव येथे कचरा टाकण्यास मनाई केली. त्यामुळे महापालिकेची चारही बाजूंनी आता कोंडी झाली असून, अशा परिस्थितीत प्रशासन करणार काय...? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

सिडको-हडकोसह चिकलठाणा, शिवाजीनगर, गारखेडा, सेव्हन हिल, क्रांतीचौक आदी भागांत कचराकोंडीची दाहकता अत्यंत कमी आहे. कारण या भागातील बहुतांश सर्व वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा होतो. ओल्या कचर्‍यावर ठिकठिकाणी प्रक्रिया करण्यात येते. जुने शहर आणि आसपासच्या परिसरात कचर्‍याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. रस्त्याच्या कडेला अक्षरश: डोंगर साचले आहेत.

मागील तीन ते चार दशकांमध्ये अशी कचराकोंडी औरंगाबादकरांनी कधीच अनुभवली नव्हती.  कचराकोंडीवर मार्ग काढण्यासाठी आतापर्यंत महापालिकेने सर्व लाईफलाईनचा वापर केला आहे. आता एकही लाईफलाईन प्रशासनाकडे शिल्लक राहिलेली नाही. कचर्‍यावर प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर आहे. त्यासाठी यंत्रसामग्री लागते. कोट्यवधींची यंत्रसामग्री ‘आणीबाणी’ कायद्यात थेट खरेदी करण्यास आयुक्त नकार देत आहेत. निविदा प्रक्रियेनेच सर्व सोपस्कर पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे. निविदा प्रक्रियेला किमान ४५ दिवस लागतील. प्रकल्प उभारणीला दोन महिने किमान लागणार, हे निश्चित. आणखी तीन महिने औरंगाबादकरांना कचराकोंडीचा सामना करावा लागणार का, हा मोठा प्रश्न आहे.

आंदोलकांनी नाक दाबल्यावर...महापालिका प्रशासनाने कचर्‍याच्या प्रश्नावर कधीच गांभीर्य दाखविले नाही. १६ फेब्रुवारीपासून नारेगावच्या आंदोलकांनी नाक दाबल्यावर महापालिकेचे डोके ठिकाणावर आले आहे. नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांपूर्वीच वॉर्निंग दिली होती, तेव्हा मनपाने आणखी मुदत वाढवून घेऊ असे म्हणत ‘टेक ईट ईझी’चे धोरण स्वीकारले होते. मनपा प्रशासनाच्या याच पद्धतीचे परिणाम शहरातील लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद