शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

औरंगाबाद मनपाला ‘टेक ईट ईझी’ धोरण पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:11 IST

शहरातील कचराकोंडीला आज २० दिवस होतील. आतापर्यंत महापालिका प्रशासनाला कचरा प्रश्नावर तोडगा काढता आला नाही.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला आज २० दिवस होतील. आतापर्यंत महापालिका प्रशासनाला कचरा प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. शहराच्या आसपास कुठेही कचरा टाकला, तर नागरिक अंगावर येत आहेत. ७ ते ८ हजार मेट्रिक टन कचरा शहरातील विविध रस्त्यांवर साचला आहे. कचर्‍याचा प्रश्न थेट खंडपीठात पोहोचला. मंगळवारी खंडपीठाने नारेगाव येथे कचरा टाकण्यास मनाई केली. त्यामुळे महापालिकेची चारही बाजूंनी आता कोंडी झाली असून, अशा परिस्थितीत प्रशासन करणार काय...? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

सिडको-हडकोसह चिकलठाणा, शिवाजीनगर, गारखेडा, सेव्हन हिल, क्रांतीचौक आदी भागांत कचराकोंडीची दाहकता अत्यंत कमी आहे. कारण या भागातील बहुतांश सर्व वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा होतो. ओल्या कचर्‍यावर ठिकठिकाणी प्रक्रिया करण्यात येते. जुने शहर आणि आसपासच्या परिसरात कचर्‍याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. रस्त्याच्या कडेला अक्षरश: डोंगर साचले आहेत.

मागील तीन ते चार दशकांमध्ये अशी कचराकोंडी औरंगाबादकरांनी कधीच अनुभवली नव्हती.  कचराकोंडीवर मार्ग काढण्यासाठी आतापर्यंत महापालिकेने सर्व लाईफलाईनचा वापर केला आहे. आता एकही लाईफलाईन प्रशासनाकडे शिल्लक राहिलेली नाही. कचर्‍यावर प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर आहे. त्यासाठी यंत्रसामग्री लागते. कोट्यवधींची यंत्रसामग्री ‘आणीबाणी’ कायद्यात थेट खरेदी करण्यास आयुक्त नकार देत आहेत. निविदा प्रक्रियेनेच सर्व सोपस्कर पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे. निविदा प्रक्रियेला किमान ४५ दिवस लागतील. प्रकल्प उभारणीला दोन महिने किमान लागणार, हे निश्चित. आणखी तीन महिने औरंगाबादकरांना कचराकोंडीचा सामना करावा लागणार का, हा मोठा प्रश्न आहे.

आंदोलकांनी नाक दाबल्यावर...महापालिका प्रशासनाने कचर्‍याच्या प्रश्नावर कधीच गांभीर्य दाखविले नाही. १६ फेब्रुवारीपासून नारेगावच्या आंदोलकांनी नाक दाबल्यावर महापालिकेचे डोके ठिकाणावर आले आहे. नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांपूर्वीच वॉर्निंग दिली होती, तेव्हा मनपाने आणखी मुदत वाढवून घेऊ असे म्हणत ‘टेक ईट ईझी’चे धोरण स्वीकारले होते. मनपा प्रशासनाच्या याच पद्धतीचे परिणाम शहरातील लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद