शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद १२८ व्या क्रमांकावरून थेट २२० वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:05 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा औरंगाबाद शहराची क्रमवारी चांगलीच घसरली आहे. मागीलवर्षी शहराला देशभरातून १२८ वा क्रमांक मिळाला होता. बुधवारी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत औरंगाबादला २२० वे स्थान मिळाले. केंद्र शासनाने या स्पर्धेसाठी काही निकष महापालिकेला ठरवून दिले होते. मनपा प्रशासनाने स्पर्धेतील बहुतांश निकष धाब्यावर बसविले. त्यामुळे क्रमवारीत चांगलीच घसरण झाली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची अनास्था : केंद्र शासनाचे निकष धाब्यावर

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा औरंगाबाद शहराची क्रमवारी चांगलीच घसरली आहे. मागीलवर्षी शहराला देशभरातून १२८ वा क्रमांक मिळाला होता. बुधवारी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत औरंगाबादला २२० वे स्थान मिळाले. केंद्र शासनाने या स्पर्धेसाठी काही निकष महापालिकेला ठरवून दिले होते. मनपा प्रशासनाने स्पर्धेतील बहुतांश निकष धाब्यावर बसविले. त्यामुळे क्रमवारीत चांगलीच घसरण झाली आहे.केंद्र शासनाने २०१५ पासून या अभिनव स्पर्धेला सुरुवात केली आहे. मागील दोन वर्षांपासून इंदूर शहर देशभरात अव्वल येत आहे. पहिल्यावर्षी औरंगाबाद शहराला ५८ वा क्रमांक मिळाला होता. २०१६ मध्ये केंद्र शासनाने नेमलेल्या खाजगी कंपनीचे कर्मचारी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आले होते. या पथकातील कर्मचाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे चक्क लाचेची मागणी केली होती. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लाचलुचपत विभागामार्फत सापळा लावून तीन कर्मचाऱ्यांना १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून दिले होते. या घटनेनंतर केंद्राने पुन्हा सर्वेक्षणासाठी दुसरी टीम पाठविली. त्यावर्षी औरंगाबादला २९९ वा क्रमांक मिळाला होता. २०१७-१८ या आर्थिक वर्षात झालेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद शहराला १२८ वा क्रमांक मिळाला होता. यंदा औरंगाबाद शहर किमान शंभरमध्ये येईल, अशी अपेक्षा मनपाची होती. बुधवारी केंद्र शासनाने निकाल जाहीर केल्यावर औरंगाबाद चक्क २२० व्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आले.कचरा कोंडीचा फटका१६ फेब्रुवारी २०१८ पासून शहरात अभूतपूर्व अशी कचरा कोंडी सुरू झाली आहे. या कचरा कोंडीतून उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९० कोटींचे अनुदानही दिले. कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिल्लीहून खास अधिकारीही दिले. मागील १२ महिन्यांमध्ये महापालिकेला कचºयाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. सहा महिन्यांपासून फक्त चिकलठाण्यात प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी शेडचे काम सुरू आहे.सार्वजनिक शौचालयांचा अभावकेंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानात विविध गुण ठेवले होते. शहरात जास्तीत जास्त सुलभ शौचालये असावेत. महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था असावी. स्वच्छतेचे अ‍ॅप किमान ३० हजार नागरिकांनी डाऊनलोड करून त्याचा वापर करायला हवा. शहरात जमा होणाºया कचºयावर शंभर टक्के प्रक्रिया व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या होत्या.पुढील वर्षी सुधारणा होईलकचरा कोंडी सुरू झाल्यावर सुरुवातीचे सहा महिने विविध उपाययोजना करण्यात गेल्या. मागील सहा महिन्यांपासून प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण होईल. त्यानंतर शहरातील शंभर टक्के कचºयावर प्रक्रिया होणार आहे. पुढील वर्षीच्या सर्वेक्षणात महापालिकेचा रँक सुधारेल.नंदकिशोर भोंबे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न