शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

निजामकाळात नवरदेवाला लागायची ‘हिमरू’चीच शेरवानी; आता गतवैभवाला लागली उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 16:05 IST

औरंगाबादची ऐतिहासिक कला कशीबशी आहे तग धरून 

ठळक मुद्दे‘हम’ म्हणजे ‘हमशकल’ आणि ‘रूह’ म्हणजे आत्मा असे या वस्त्राचे ‘हमरू’ शहरातील पर्यटन मंदावल्याचा फटकाही हिमरूवर झाला आहे

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : निजामाच्या काळात अशी परिस्थिती होती की, नवरदेवाला फक्त हिमरू कपड्यापासून बनवलेली शेरवानीच लागायची. मानाची समजली जाणारी हिमरूची शेरवानी नसेल तर लग्नसमारंभ अपूर्ण वाटायचा. राजा-महाराजांकडून हिमरू शाल भेट स्वरूपात देश-विदेशातील पाहुण्यांना अगत्याने दिली जायची आणि त्यांनाही तो त्यांचा सन्मान वाटायचा. असा राजेशाही थाट उपभोगलेल्या हिमरू शालीच्या वैभवाला आता मात्र उतरती कळा लागली असून, विक्री खूप खालावली आहे.

हिमरू शालीचा इतिहास सांगताना इतिहास अभ्यासक रफत कुरेशी म्हणाले की, १४ व्या शतकात मोहम्मद बीन तुघलक याने आपली राजधानी दिल्ली येथून दौलताबादला आणली. तेव्हा त्याच्यासोबत हिमरूचे विणकाम करणारे काही कारागीर, उद्योगपती दौलताबादला आले. तेथे स्थायिक होऊन त्यांनी त्यांची कला त्याठिकाणी फुलविली. यानंतर औरंगजेब जेव्हा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला, तेव्हा तो दौलताबादला न राहता औरंगाबादला राहू लागला. जेथे राजा राहायचा, तेथेच व्यापारी, उद्योजक, कारागीर राहायचे. म्हणून मग औरंगजेब पाठोपाठ हिमरूचे व्यापारी आणि उद्योगपतीही दौलताबादहून औरंगाबादेत आले आणि येथेच स्थायिक झाले आणि हिमरू औरंगाबादची म्हणून ओळखली जाऊ लागली. 

पूर्वी हिमरू या वस्त्रापासून पुरुषांसाठी झब्बा शिवला जायचा. यानंतर यामध्ये बदल झाला आणि महिला जाकीट शिवण्यासाठी या कपड्याचा उपयोग करू लागल्या. यानंतर निजामाच्या काळात तर नवरदेवाला शेरवानी शिवण्यासाठी हे एक मानाचे वस्त्र म्हणून वापरले जायचे. नंतर पुन्हा या वस्त्राचा उपयोग बदलला आणि घराचे पडदे, बेडसीट, सोफा कव्हर म्हणून हिमरू वापरले जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे तर राष्ट्रपती भवन आणि दिल्ली येथील सरकारी निवासस्थानांसाठी पडदे, बेडसीट आणि सोफा कव्हर म्हणून फक्त हिमरूच वापरले जायचे. यामुळे हिमरू व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मदत झाली.

याशिवाय कोणी सरकारी पाहुणा औरंगाबादला आलाच तर त्यालाही आवर्जून हिमरूचे उत्पादन करणारा कारखाना दाखविला जायचा. हा या व्यवसायाचा मोठा सन्मान होता; पण हळूहळू असे पाहुणे येणे बंद झाले आणि हिमरूची खरेदीही थंडावली.परदेशी पाहुण्यांना हिमरूचे आकर्षण असायचे; पण हिमरू कपडा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांच्या देशात घेऊन जाणे शक्य व्हायचे नाही. यावर पर्याय म्हणून अब्दुल हमीद कुरेशी यांनी हिमरू वस्त्राची शाल बनविली आणि मग हिमरू शाल स्वरूपात ओळखली जाऊ लागली. सध्या हिमरू ही शाल लहान आकाराच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. 

पर्यटन कमी झाल्याचा फटकाएकंदरीतच औरंगाबाद शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी झाली आहे. मुंबई, जयपूर, उदयपूर या ठिकाणच्या पर्यटकांच्या तुलनेत औरंगाबादेतील पर्यटकांची आकडेवारी अत्यल्प आहे. यातही निवडक परदेशी पर्यटकच हिमरू शालीच्या खरेदीस प्राधान्य देतात. त्यामुळे शहरातील पर्यटन मंदावल्याचा फटकाही हिमरूवर झाला आहे, असे जाणकारांचे मत आहे.

कुरेशी परिवाराचे योगदानभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बादशाही, राजघराणी संपुष्टात आली आणि या व्यवसायाला मिळणारी रॉयल्टी बंद झाली. उद्योग क्षेत्रातही क्रांती झाल्यामुळे अनेक कारखाने बंद झाले. कारागीर अन्य व्यवसायात गेले आणि हिमरू व्यवसायाचा ओघ हळूहळू कमी होत गेला. औरंगाबादचे भूषण असणारी ही प्राचीन कला जपण्याचा प्रयत्न औरंगाबादेतील कुरेशी परिवार आवर्जून करीत असून, यामुळेच दहा वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अहमद सईद कुरेशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. हाताने विणली गेली असेल तर तेच खरे हिमरू वस्त्र म्हणून ओळखले जाते; पण आता मात्र सर्रास मशीनवर विणकाम होत असून, या वस्त्राला खऱ्या हिमरूची सर येत नाही, असे रफत कुरेशी यांनी सांगितले.

हिमरूचा इतिहास१४ व्या शतकाच्या आधीच्या काळात किमखाब नावाचे वस्त्र होते. ‘किमखाब’ म्हणजे असा उंची कपडा जो केवळ ‘ख्वाब’मध्येच मिळणे शक्य होईल. रेशमी वस्त्रावर सोन्या-चांदीचा जर वापरून ते विणले जायचे. हे वस्त्र अत्यंत महागडे असल्यामुळे केवळ राजे-महाराजे यांच्याकडूनच त्याचा वापर व्हायचा. अशाप्रकारचे वस्त्र थोड्या कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी रेशमी कपड्याऐवजी लोकर किंवा सुती कपडा तसेच सोने-चांदीऐवजी जर किंवा रेशमाने केलेले विणकाम अशा प्रकारचे वस्त्र तयार झाले. ‘किमखाब’ या वस्त्राशी मिळते-जुळते असल्यामुळे याला ‘हमरू’ असे नाव पडले. ‘हम’ म्हणजे ‘हमशकल’ आणि ‘रूह’ म्हणजे आत्मा असे या वस्त्राचे ‘हमरू’ असणारे मूळ नाव कालपरत्वे अपभ्रंश होत होत ‘हिमरू’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 

टॅग्स :artकलाAurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक