शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांचे शिर्डीहून मुंबई, दिल्लीचा हवाई प्रवास; नव्या विमान सेवेची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:20 IST

जेट एअरवेजचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान महिनाभरापासून बंद आहे.

ठळक मुद्देआता थेट सायंकाळीच एअर इंडिया आणि ट्रू जेटच्या विमानांचे उड्डाण शिर्डीहून दिल्लीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणारे जेट एअरवेजचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान महिनाभरापासून बंद आहे. परिणामी, आता थेट सायंकाळीच एअर इंडिया आणि ट्रू जेटच्या विमानांचे उड्डाण होत आहे. परिणामी, सकाळी मुंबई आणि दिल्लीला विमानाने जाऊ इच्छिणारे प्रवासी शिर्डी विमानतळाकडे वळत असल्याने औरंगाबादेत चिंता व्यक्त होत आहे. 

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने आपली विमान वाहतूक तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेट एअरवेजची औरंगाबादहून सुरूअसलेली सकाळ आणि सायंकाळची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा बंद पडली आहे. आजघडीला हैदराबाद- तिरुपती, मुंबई आणि दिल्ली या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. एअर इंडिया, ट्रू जेट या दोन कंपन्यांकडून ही विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांच्या विमानांचे उड्डाण हे दुपारनंतर होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत आणि तातडीने मुंबई आणि दिल्लीला जाऊ इच्छिणारे प्रवासी अशा परिस्थितीत शिर्डी विमानतळाचा पर्याय अनेक जण निवडत आहेत. औरंगाबादेहून शिर्डी गाठून दिल्ली, मुंबईला जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याप्रमाणेच या दोन शहरांतून औरंगाबादला येणारे प्रवासीही शिर्डीचा पर्याय निवडत आहेत.

एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे जेट एअरवेजचे उड्डाण होत असताना एअर इंडियाचे मुंबई- औरंगाबाद- दिल्ली, दिल्ली- औरंगाबाद- मुंबई मार्गावर  १२२ प्रवासी क्षमतेचे विमान होते. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर प्रवाशांची मागणी वाढत असल्याने १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमानाचे उड्डाण होत असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नव्या विमानसेवेसाठी प्रयत्ननव्या विमानसेवेसाठी पाठपुरावा आणि प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांना यश येऊन आगामी काही दिवसांत नवीन विमानसेवा सुरू होईल, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी सांगितले.

वाढते प्रमाणशिर्डीहून दिल्लीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईला जाण्यासाठीही शिर्डीकडे वळत आहेत; परंतु त्याचे प्रमाण अधिक नाही. मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्पे्रसचा पर्याय वाढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या विमानसेवेसंदर्भात काही हालचाली होतील, असे औरंगाबाद टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळJet Airwaysजेट एअरवेज