शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

औरंगाबादकरांच्या स्वप्नातील ‘स्मार्ट बस’ रस्त्यावर आलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:35 IST

महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.

ठळक मुद्देलोकार्पणानंतर : आरटीओच्या पासिंगमध्ये अडकल्या बस

औरंगाबाद : महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांना बस खरेदीची बरीच घाई झाली होती. टाटा कंपनीकडून ३६ लाख रुपयांमध्ये एक बस खरेदी करण्यात आली. तब्बल १०० बसची आॅर्डर कंपनीला देण्यात आली आहे. कर्नाटकच्या धारवाड येथे बसची बांधणी सुरू आहे. आतापर्यंत मनपाला चार बस प्राप्त झाल्या आहेत. रविवारी महापालिकेने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बसचे लोकार्पण केले. पहिल्या भाग्यवान ग्राहकाला तिकीटही देण्यात आल्याची घोषणा केली. सोमवारी किमान चार बस शहरातील प्रमुख मार्गांवर धावतील, असे औरंगाबादकरांना वाटत होते. कारण मागील आठ दिवसांमध्ये महापालिकेने शहर बसची जोरदार मार्केटिंग केली होती. सोमवारी एकही बस मनपाने रस्त्यावर आणली नाही. कंपनी आणि मनपाचे अधिकारी पासिंगच्या प्रक्रियेत होते. दिवसभरात एकाच बसची पासिंग झाली. बुधवारी उर्वरित बसची पासिंग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.४३ बस कधी येणार...शहर बस चालविण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळ पार पाडणार आहे. पहिल्या टप्प्यात ४० ते ४५ बस येतील, असे सांगण्यात आले होते. डिसेंबरअखेपर्यंत मनपाला फक्त ४ बस प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ४३ बस जानेवारी महिन्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. एस.टी. महामंडळाने तूर्त ४० बस चालविण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित ६० बस चालविण्यासाठी महामंडळाला मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करावी लागणार आहे.बसथांबे जशास तसेमहापालिकेने मोठा गाजावाजा करून शहर बसचे लोकार्पण तर केले; परंतु आतापर्यंत मनपाने एकही बसथांबा अद्ययावत केलेला नाही. स्मार्ट सिटीतील बसथांबे अद्ययावत राहतील, अशी घोषणा मनपाकडूनच करण्यात आली होती. बसथांबे कोठे असावेत, याचेही नियोजन मनपाने आजपर्यंत केलेले नाही. त्यासाठी लागणाºया खर्चाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. फक्त बस खरेदी करून एस.टी. महामंडळाला देण्याचीच घाई मनपाला होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBus Driverबसचालक