शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

औरंगाबादकरांना स्मार्ट सिटी बसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:24 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराची जीवनवाहिनी असते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून हालचाल सुरू आहे; परंतु पाच, दहा बस देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीचा विचार करून चांगल्या आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक वाहतुकीचे जाळे पसरावे शहरभर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराची जीवनवाहिनी असते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून हालचाल सुरू आहे; परंतु पाच, दहा बस देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीचा विचार करून चांगल्या आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे.

एसटी महामंडळाच्या कारभारामुळे काही वर्षांपासून शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढेपाळली आहे. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून एकप्रकारे शहर बससेवा आपल्या खांद्यावरून महानगरपालिकेच्या खांद्यावर सोपविण्याचे प्रयत्न एसटी महामंडळाकडून वेळोवेळी झाले; परंतु या नुकसानीला कोणत्या बाबी कारणीभूत आहेत, याचा विचारच केला गेला नाही. त्यामुळे शहरातील केवळ १३ मार्गांवर अवघ्या ३१ शहर बसेस धावत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पाच बस खरेदी करून त्या चालविण्यासाठी महामंडळाला देण्यात येणार आहेत.

जानेवारी २०१८ पासून या पाच बस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या पाच बसेस सुरू करताना पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. ही व्यवस्था चांगली असेल तर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणाचा ताण कमी होईल. शहरात अधिकाधिक लोकांना कमीत कमी वेळात पाहिजे त्याठिकाणी किफायतशीर दरात जाता यावे, हाच मुख्य उद्देश ठेवून नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे जाळे शहरभर पसरविले पाहिजे.

स्मार्ट सिटीच्या प्रवासात आता शहर बससेवेचा विचार होत आहे. त्यामुळे किमान पुढील काही महिन्यांत औरंगाबादेत सक्षम शहर बसचे दर्शन औरंगाबादकरांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रस्त्यांवर रिक्षांचे साम्राज्य, त्यांची मनमानी थांबविण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. शहर बसला प्रतिसाद असतानाही एसटी महामंडळ नेहमीच जबाबदारी झटकत होते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. परंतु यापुढे शहरात प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस देणे आवश्यक आहे. चिकलठाणा, मुकुं दवाडी भागातून विद्यापीठात जाणाºया विद्यार्थ्यांना औरंगपुºयापर्यंत बसने आणि त्यानंतर तेथून विद्यापीठाचा प्रवास रिक्षाने करावा लागतो. अशीच स्थिती इतर भागांची आहे. ती अवस्था दूर व्हावी, अशी सर्वसामान्य प्रवाशांची अपेक्षा आहे. चिकलठाणा ते वाळूज मार्गावर किमान दर २० मिनिटाला शहर बस उपलब्ध झाली पाहिजे. शिवाजीनगर, शहानूरमियाँ दर्गा चौक, सिल्लेखाना चौक, समर्थनगर, सातारा, देवळाईसह शहरातील विविध भागांत ठराविक वेळेत शहर बसची सुविधा मिळाली पाहिजे.

अत्यावश्यक मार्गांवर सेवासध्या चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे आजघडीला अत्यावश्यक मार्गांवर शहर बस चालविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे.-संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

सर्वसामान्यांना सुविधाशहरातील रस्त्यांनुसार कोणत्या भागात कोणत्या आकाराची बस अधिक चांगली राहील, याचे नियोजन केले जात आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून शहर बससेवा देण्यास प्राधान्य दिले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे अन्य वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राहील, असे नियोजन केले जात आहे.-नवल किशोर राम, जिल्हाधिकारी