शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

औरंगाबाद जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:07 IST

अधिकारी आणि पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे मागील आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी अजूनही ३१ कोटी १२ लाख ५७ हजार रुपयांचा निधी खर्चाच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पडून आहे.

ठळक मुद्देशासनाकडून आतापर्यंत अवघा ३८ टक्के निधी प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अधिकारी आणि पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे मागील आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी अजूनही ३१ कोटी १२ लाख ५७ हजार रुपयांचा निधी खर्चाच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पडून आहे.नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यापासून अधिकारी आणि पदाधिकाºयांचा सूर जुळलेला नाही. कधी प्रशासनावर अविश्वास दाखवून, तर कधी अधिकाºयांना ‘टार्गेट’ केले जात असल्यामुळे जिल्हा परिषदेत कामांचे नियोजन वेळेत होऊ शकले नाही. आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या दोनच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असताना प्राप्त निधी खर्च व्हावा, अशी ना प्रशासनाची मानसिकता दिसते, ना पदाधिकाºयांची. मागील आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीपैकी चालू आर्थिक वर्षात ७५ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांचा अखर्चित होता.शासनाकडून मिळालेला निधी दोन वर्षांत खर्च करण्याची जिल्हा परिषदेला मुभा असते. त्या अनुषंगाने मागील शिल्लक ७५ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांपैकी या वर्षात ४३ कोटी ८८ लाख ९९ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. अजूनही ३१ कोटी १२ लाख ५७ हजार रुपये शिल्लक आहेत.यासंदर्भात वित्त विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, आता जवळपास सर्वच विभागांच्या कामांचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यामुळे मागील वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित असलेला सर्वच निधी चालू आर्थिक वर्षामध्ये खर्च होईल.यंदा ‘जीएसटी’मुळे तीन-चार महिने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकाम व सिंचन विभागांची अनेक कामे पडून होती. कंत्राटदार कामे करण्यास तयार नव्हते. आता संभ्रमावस्था दूर झालीआहे.यंदाचा मार्चअखेर एप्रिलच्या १०-१५ तारखेपर्यंत चालेल. त्यामुळे दोन वर्षांत खर्च करण्याचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होईल.यंदा ३० टक्के निधी कपातशासनाकडून प्राप्त होणाºया निधीतून ३० टक्के महसुली व भांडवली कपात करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून १११ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी जिल्हा परिषदेला आतापर्यंत ३८ कोटी ३० लाख ८७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. हा निधी पुढील आर्थिक वर्षातही खर्च करता येईल, असा दावा वित्त विभागातील अधिकाºयांनी केला आहे.