शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

औरंगाबाद जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:07 IST

अधिकारी आणि पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे मागील आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी अजूनही ३१ कोटी १२ लाख ५७ हजार रुपयांचा निधी खर्चाच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पडून आहे.

ठळक मुद्देशासनाकडून आतापर्यंत अवघा ३८ टक्के निधी प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अधिकारी आणि पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे मागील आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी अजूनही ३१ कोटी १२ लाख ५७ हजार रुपयांचा निधी खर्चाच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पडून आहे.नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यापासून अधिकारी आणि पदाधिकाºयांचा सूर जुळलेला नाही. कधी प्रशासनावर अविश्वास दाखवून, तर कधी अधिकाºयांना ‘टार्गेट’ केले जात असल्यामुळे जिल्हा परिषदेत कामांचे नियोजन वेळेत होऊ शकले नाही. आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या दोनच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असताना प्राप्त निधी खर्च व्हावा, अशी ना प्रशासनाची मानसिकता दिसते, ना पदाधिकाºयांची. मागील आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीपैकी चालू आर्थिक वर्षात ७५ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांचा अखर्चित होता.शासनाकडून मिळालेला निधी दोन वर्षांत खर्च करण्याची जिल्हा परिषदेला मुभा असते. त्या अनुषंगाने मागील शिल्लक ७५ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांपैकी या वर्षात ४३ कोटी ८८ लाख ९९ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. अजूनही ३१ कोटी १२ लाख ५७ हजार रुपये शिल्लक आहेत.यासंदर्भात वित्त विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, आता जवळपास सर्वच विभागांच्या कामांचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यामुळे मागील वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित असलेला सर्वच निधी चालू आर्थिक वर्षामध्ये खर्च होईल.यंदा ‘जीएसटी’मुळे तीन-चार महिने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकाम व सिंचन विभागांची अनेक कामे पडून होती. कंत्राटदार कामे करण्यास तयार नव्हते. आता संभ्रमावस्था दूर झालीआहे.यंदाचा मार्चअखेर एप्रिलच्या १०-१५ तारखेपर्यंत चालेल. त्यामुळे दोन वर्षांत खर्च करण्याचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होईल.यंदा ३० टक्के निधी कपातशासनाकडून प्राप्त होणाºया निधीतून ३० टक्के महसुली व भांडवली कपात करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून १११ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी जिल्हा परिषदेला आतापर्यंत ३८ कोटी ३० लाख ८७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. हा निधी पुढील आर्थिक वर्षातही खर्च करता येईल, असा दावा वित्त विभागातील अधिकाºयांनी केला आहे.