शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

जिल्हा परिषद सीईओंचा दणका; कामात हलगर्जीपणामुळे कन्नड तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 14:32 IST

Aurangabad Zilla Parishad CEOs strict action जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील ग्रामीण आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्याने त्याचा त्रास रुग्ण व नातेवाईकांना होत आहे

ठळक मुद्देसंपूर्ण आरोग्य यंत्रणेची केली कानउघाडणीवैद्यकीय अधीक्षकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

औरंगाबाद : कन्नडमध्ये संसर्ग वाढत असताना मृत्यूदरही ३ टक्क्यांवर पोहोचला आहे. येथील आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी दुपारी कन्नड गाठले. सुटीच्या दिवशी अचानक दिलेल्या भेटीत ग्रामीण रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील असमन्वय समोर आला. कामातील दुर्लक्ष आणि हलगर्जीपणाबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बाळकृष्ण लांजेवार यांचा तत्काळ पदभार काढला. तर कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील ग्रामीण आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्याने त्याचा त्रास रुग्ण व नातेवाईकांना होत असल्याचे डाॅ. गोंदावले यांच्यासमोर आल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बाळकृष्ण लांजेवार यांना तत्काळ पदभार काढून हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. हेमंत गावंडे यांच्याकडे सोपवला. ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीत वैद्यकीय अधीक्षकांच्या डॉ. दत्ता देगावकरांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून कारवाईची शिफारस करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गोंदावले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कामात हलगर्जीपणा सहन करणार नाहीकोरोनाचे संकट जिल्ह्यात वाढत असताना प्रत्येकाने दिलेल्या आदेशानुसार शिस्तीत काम करणे अपेक्षित आहे. अशाच सरप्राईज व्हिजिट देऊन कामकाजाची पडताळणी पुढील काळातही केली जाईल. कोरोनाला प्रतिबंध करणे, लसीकरण वाढवणे असंक्रमित गावे संक्रमणापासून वाचवण्याला यंत्रणेची प्राथमिकता असल्याचे सांगत कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- डॉ. मंगेश गोंदावले, सीईओ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद