शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

समाजकल्याण विषय समितीचे योजना बदलातच गेले सात महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 19:27 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीने यंदा काही योजनांमध्ये बदल केला असून त्यासंबंधीच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीने यंदा काही योजनांमध्ये बदल केला असून त्यासंबंधीच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून ३१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत योजनांच्या पूनर्नियोजनाला मान्यता घेतली जाईल. तथापि, यंदाच्या आर्थिक वर्षातील सुमारे सात महिन्यांचा कालावधी केवळ योजना बदलातच गेला. त्यामुळे येणाऱ्या दोन- अडिच महिन्यात वैयक्तिक लाभाच्या योजना मार्गी लावण्यासाठी समाजकल्याण सभापती बेडवाल यांनी कंबर कसली आहे. 

आज शुक्रवारी समाजकल्याण विषय समितीची बैठक झाली. या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या विषय समितीच्या बैठकीत सोलार वॉटर हिटर, जि.प, समाजकल्याण कार्यालयाचे बळकटीकरण, प्रचार व प्रसिद्धी, योजना राबविण्यासाठी प्रशासकीय खर्च, अनुदानित वसतिगृहांना सोलार वॉटर हिटर पुरविणे, ठिबक सिंचन, दुग्ध व्यवसायासाठी गाय- म्हैशींसाठी अर्थसहाय्य, मागासवर्गीयांच्या वस्तीमध्ये ग्रीन जीम, रेशिम शेतीसाठी अर्थसहाय्य आदी १ कोटी ८७ लाखांच्या योजना रद्द करण्यात आल्या व त्याऐवजी मागासवर्गीय लाभार्थ्यांना झेरॉक्स मशिन, संगणक, मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ग्रंथालय, शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप, लोखंडी पत्रे, पिको फॉल मशिन व पिठाची गिरणी आदी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यासंदर्भात समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल म्हणाले की, आगामी लोकसभा- विधानसभेची आचार संहिता लागू होण्यापूर्वी सदरील १ कोटी ८७ लाखांच्या वैयक्तीक लाभाच्या योजना मार्गी लागल्या पाहिजेत, या दिशेने पाऊल उचलले आहे. या सर्व योजनांचे अर्ज तालुकास्तरावर पंचायत समित्यांना सादर करण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या पुनर्नियोजनास मान्यता देण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात जि.प. उपकरातील २० टक्के निधीतील वैयक्तीक लाभाच्या ईलेक्ट्रीक मोटार, कडबा कटर, मागासवर्गीय वस्त्यांना कचराकुंडी आदी योजना वेळेत राबविण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे सुमारे २ कोटी ४० लाख रुपये अखर्चित राहिले. या दायित्वातून यंदा सदरील योजना राबविल्या जाणार आहेत. 

वादात अडकल्या योजना यासंदर्भात सभापती धनराज बेडवाल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय मुलींसाठी हवाई सुंदरी प्रशिक्षण, मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला होता. दरम्यान, या योजनांचा ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना फायदा होणार नाही म्हणून विषय समितीमध्ये सदस्यांनी या योजनांना विरोध केला होता. सदरील योजनांचे पुनर्नियोजन करण्याचा प्रस्ताव वादात अडकला होता. यामध्ये बराच कालावधी गेला. त्यानंतर सदरील योजना रद्द करण्यात आल्या. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदSocialसामाजिकgovernment schemeसरकारी योजना