शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

औरंगाबादेत अकरावी प्रवेशाच्या दहा हजार जागा रिक्त राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:06 IST

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद मनपा हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अॉनलाईन नोंदणीची मुदत सोमवारी संपली.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी आणि उपलब्ध जागांची संख्या पाहता जवळपास १० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद मनपा हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अॉनलाईन नोंदणीची मुदत सोमवारी (दि.२५) संपली. अकरावीच्या प्रवेशासाठी २२ हजार १५ विद्यार्थ्यांनी भाग-१ ची नोंदणी केली, तर भाग-२ नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १९ हजार १५९ एवढी आहे. शहरातील ११२ महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विना अनुदानित, कायमविना अनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यीत जागांची संख्या ही २८ हजार ७३५ आहे. यामुळे अकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी आणि उपलब्ध जागांची संख्या पाहता जवळपास १० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

अकरावीतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी भाग-१ आणि २ भरणे बंधनकारक होते. यासाठी सोमवारपर्यंत (दि.२५) मुदत देण्यात आली होती. यात औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी भाग-१ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ हजार १५ एवढी असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. मात्र, याचवेळी भाग-२ भरणे विद्यार्थ्यांना बंधनकारक होते. भाग-२ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र १९ हजार १५९ एवढी आहे. यामुळे महाविद्यालयातील उपलब्ध जागा आणि नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या पाहता अकरावीच्या दहा हजारांपेक्षा अधिक जागा रिक्तY राहण्याची शक्यता आहे. अकरावीतील प्रवेशाच्या अॉनलाईन नोंदणीला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी दिली.

बायफोकल विषयांसाठी आज १ वाजेपर्यंत प्रवेशअकरावीच्या बायफोकल विषय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश घेण्याची मुदत २२ जूनपर्यंत होती. मात्र, या कालावधीत काही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन ११ वी अॉनलाईन प्रवेशांच्या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत अपलोड करण्याचे आवाहन सहायक शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र