शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

औरंगाबाद : माथाडी कामगार वेठबिगार आहेत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:25 IST

माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी २५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणारे माथाडी कामगार वेठबिगार आहेत काय, असा संतप्त सवाल आज येथे बंधुआ मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी २५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणारे माथाडी कामगार वेठबिगार आहेत काय, असा संतप्त सवाल आज येथे बंधुआ मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याचा आज २५ वा दिवस होता. तरीही आंदोलकांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने अद्याप गांभीर्याने पाहिलेले नाही. या बाबीचा स्वामी अग्निवेश यांनी निषेध केला. दुपारी त्यांनी आंदोलकांची भेट घेतली व आपले मनोगत मांडले. यावेळी महाराष्टÑ राज्य हमाल- मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, जनता दलाचे अजमल खान, श्रमिक मुक्ती दलाचे सबेदार मेजर बन, मराठवाडा लेबर युनियनचे देवीदास कीर्तिशाही, छगन गवळी, प्रवीण सरकटे, जगन भोजने आदींची उपस्थिती होती.देशातील ९३ टक्के असंघटित कष्टकऱ्यांना, ज्यांचा राष्टÑीय उत्पन्नात ६५ टक्के वाटा आहे. केंद्र सरकारने विनाविलंब चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा व म्हातारपणासाठी पेन्शन सुरू करण्यात यावी, या मागण्यांवर त्यांनी भर दिला.ठिय्या आंदोलन करणाºया माथाडी कामगारांचे अभिनंदन करून केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री, कामगार मंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मध्यस्थी करण्याचे आश्वासनही स्वामी अग्निवेश यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिले.येत्या १९ मार्चपर्यंत प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर २० मार्चपासून माथाडी कामगार सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा साथी लोमटे यांनी यावेळी दिला.नया जमाना आयेगा...बंधुआ मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांनी आपले भाषण सुरूकरण्यापूर्वी उपस्थितांना मूठ आवळायला सांगून नंतर घोषणा द्यायला सांगितले.‘कमानेवाला खायेगा, लुटनेवाला जायेगा, नया जमाना आयेगा’ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वामींनी दणाणून सोडला. उपस्थितांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला.स्वामी अग्निवेश यांनी यावेळी जिल्हा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्तीच केली. केलेल्या कामाची मजुरी व लेव्ही, माथाडी मंडळात दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत भरलीच पाहिजे, असा जर माथाडी मंडळाचा कायदा असेल तर थकबाकी ठेवणाºया संस्थांचे करारच शिल्लक कसे राहतात?, त्यांना बरखास्त का केले जात नाही?, त्यात कुणाचे संबंध आड येतात का?, या सर्व बाबींच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.