शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Aurangabad Violence : दंगलीत होरपळलेल्यांना शासकीय मदतीची घोषणा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:48 PM

ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले. दंगलीच्या ४८ तासांनंतरही राज्य शासनाकडून मदतीची कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी राज्यात दंगल उसळल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला शासनाकडून मदत जाहीर झालेली आहे. औरंगाबादच्या बाबतीत राज्य शासन वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका का घेत आहे, असा संतप्त सवाल दंगलीत होरपळलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दंगलीत ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत, त्यातील बहुतांश व्यापारी उधारीत माल आणणारे आहेत. अनेकांनी तर विमाही काढलेला नाही. शेकडो वाहने जळाली. त्यातील ९० टक्के वाहनांचा विमा काढलेला नाही. दंगलीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. मोठे व्यापारी हा त्रास सहन करू शकतील. मात्र, छोट्या व्यापाऱ्यांचे काय? त्यांना आर्थिक मदत कोण करणार... ज्या नागरिकांची घरे जाळण्यात आली. ती कुटुंबे उघड्यावर आली. त्यांना शासन सढळ हाताने मदत करणार नाही का...? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

दंगलीत दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यात एक १७ वर्षीय तरुण होता. या कुटुंबियांना अद्याप शासनाने आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. यापूर्वीच्या अनेक दंगलींमध्ये राज्य शासनानेच मदतीची घोषणा केली आहे. दंगलीच्या ४८ तासांनंतरही शासनाने घोषणा का केली नाही. गृहराज्यमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. पोलिसांनी प्राथमिक पंचनामे तयार करून अहवालही पाठवून दिला.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसState Governmentराज्य सरकारAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद