शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Aurangabad Violence : आम्ही दंगल रोखली, पोलिसांना वाचविले - चंद्रकांत खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:13 IST

एवढेच नव्हे तर दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आम्हीच रुग्णालयात दाखल केले, असा दावा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.

औरंगाबाद : विरुद्ध बाजूने आमच्यावर जोरदार दगडफेक सुरू होती, दंगेखोरांना रोखण्यासाठी आम्ही धावलो, अन्यथा दंगेखोर गुलमंडी, सराफा, औरंगपुरा आणि पैठणगेटपर्यंतच्या भागात जाळपोळ आणि लुटालूट करण्याच्या तयारीत होते. एवढेच नव्हे तर दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आम्हीच रुग्णालयात दाखल केले, असा दावा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.

जुन्या शहरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून आरोपींची धरपकड सुरू केली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जातीय दंगल घडविण्यात आली. आमच्या घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. अनपेक्षितपणे दंगल करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. हे शहर १९८९ पासून शिवसेनाप्रमुखांमुळे शांत आहे. असे असताना एमआयएमकडून शहर डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ११ मे रोजी रात्री गांधीनगरात वाद झाल्याचे कळताच आम्ही तिकडे गेलो. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे असताना मोतीकारंजा, नवाबपुरा, राजाबाजार येथे दंगेखोरांनी जाळपोळ आणि दगडफेक सुरू केल्याचे कळाले. तेथील रहिवासी प्रचंड घाबरले होते, त्यांनी आम्हाला फोन करून बोलावले.

शिवसेना, लच्छू पहिलवानला लोकांनी बोलावून नेले. आम्ही तेथे धावलो आणि दंगेखोरांना रोखून धरले, अन्यथा त्यांना गुलमंडी, औरंगपुरा ते पैठणगेटपर्यंत जाळपोळ आणि लुटालूट करायची होती. दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत आमचे सुमारे २५० लोक आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलीस अधिकारी गोवर्धन कोळेकर, रामेश्वर थोरात यांना आम्ही रुग्णालयात दाखल केले. पोलीस आयुक्त सकाळी ६ वाजता येथे आले तेव्हा त्यांच्यासमोर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. तेव्हाच त्यांना तुम्हाला रोखता येत नसेल तर आम्ही रोखण्यास समर्थ असल्याचे सांगितले. 

...तेव्हा कोठे होते विखे पाटील अन् झांबडदंगलीनंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. सुभाष झांबड यांनी येथे येऊन आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले. दंगेखोर सामान्यांची घरे जाळत होते, तेव्हा कोठे होते विखे पाटील आणि झांबड. जैन मंदिराला आम्ही संरक्षण दिले. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे येथे काय काम आहे, असा सवाल यावेळी खा.खैरे यांनी केला.

शिवसेनेवर कारवाई कराल, तर खबरदार..आम्ही दंगेखोरांच्या तावडीतून नागरिकांना वाचविले. दंगेखोरांवर कारवाई करण्याऐवजी आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. आमच्यावर कारवाई कराल, तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. या शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले, माजी आ. प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, राजेंद्र दानवे, संतोष खेंडके पाटील, राजू वैद्य, बाबासाहेब डांगे अन्य पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना