शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : दोन दिवसांत महसूलचे पंचनामे होणार पूर्ण; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:02 IST

जुन्या शहरातील गुलमंडी, नवाबपुरा, राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, मोतीकारंजा या भागांत शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या दंगलीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येतील.

ठळक मुद्दे सोमवारी दुपारी २ वा. पंचनाम्यांना सुरुवात. . घटनास्थळी असलेले वास्तव आणि मालमत्ताधारकांनी दिलेल्या बयाणानुसार पंचनामे होतील

औरंगाबाद : जुन्या शहरातील गुलमंडी, नवाबपुरा, राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, मोतीकारंजा या भागांत शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या दंगलीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येतील. सोमवारी दुपारी २ वा. पंचनाम्यांना सुरुवात केली. घटनास्थळी असलेले वास्तव आणि मालमत्ताधारकांनी दिलेल्या बयाणानुसार पंचनामे होतील. त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधणारा अहवाल शासनाकडे  पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

जिल्हाधिकारी म्हणाले, महसूल, पीडब्ल्यूडी, मनपा, सीटीएस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीतून पंचनामे होतील. पोलीस क्राईमच्या अनुषंगाने पंचनामे करीत आहेत. मालमत्ता नुकसानीचे पंचनामे होतील. त्यासाठी पथक गठित केले आहे. सध्या परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तहसीलदार रमेश मुंडलोड आणि सतीश सोनी यांच्या नेतृत्वातील पथकांकडून पंचनामे केले जातील. त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी आणि तलाठी असतील. क्षतिग्रस्त मालमत्तांचे  मूल्यांकन केले जाईल. उद्या संध्याकाळी किंवा बुधवार सकाळपर्यंत पंचनामे पूर्ण होतील. पंचांसमक्ष जे दिसेल त्यावरून आणि मालमत्ताधारकांच्या बयाणांवरून नोंदणी होईल. नुकसानीत मालाचे नुकसान झाल्याचे दावे होतील; परंतु वस्तुस्थिती पाहिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पंचनाम्यासाठी ५ पथके नियुक्तदंगलीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, नगर भूमापन, प्रादेशिक परिवहन आणि महानगरपालिकेचा समावेश असलेला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच पथकांची नियुक्ती आज करण्यात आली आहे. या पथकाने वस्तुस्थितीदर्शक पंचनामे करून १५ रोजी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावयाचा आहे. हे कामकाज कायदा व सुव्यस्थेंतर्गत अत्यंत संवेदनशील असल्याने नेमलेल्या पथकांनी कामाचे गांभीर्य व कालमर्यादा लक्षात घेऊन पंचनामे करावेत, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. या पथकांमध्ये पथक प्रमुख म्हणून अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, नगर भूमापन अधिकारी के.आर. मिसाळ, मनपाचे वार्ड अधिकारी अस्लम खान, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते, उपअभियंता फारुक खान यांचा समावेश आहे. 

नुकसानीचे पंचनामे करून पाठपुरावा करणारदंगलीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठविल्यानंतर त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. शेवटी मदतीसाठी काय पॅकेज द्यायचे, याचा निर्णय शासनच घेईल. दंगलीत जे दगावले, त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद