शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Aurangabad Violence : चौकशीत सत्य बाहेर येणार - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:20 IST

दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले.

औरंगाबाद : शहरातील दंगलीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दंगल का घडली... याला जबाबदार कोण... हा पूर्वनियोजित कट होता का... या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीत बाहेर येणार आहेत. सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले.

दंगलीनंतर खा. दानवे यांनी राजाबाजार परिसराला भेट दिली. दंगलग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. तत्पूर्वी खा. दानवे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. दानवे म्हणाले की, दंगलीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिसांची वाढीव कुमक पाठविण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी तातडीने जादा पोलीस पाठविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दंगल दुर्दैवी असून, दंगल का घडली, त्याच्या मुळाशी पोलीस जाणारच आहेत. चौकशीतून दंगलीमागचे सत्य बाहेर येणार आहे. या घटनेत रॉकेल, पेट्रोल बॉम्ब, मिरची पूड, दगडांचा साठा, काचेच्या गोट्या जमा केला होत्या. दंगल पूर्वनियोजित होती का, हे आताच सांगणे योग्य ठरणार नाही. आर्थिक मदत केली जाईल, असे दानवे यांनी नमूद केले. 

शहराची परिस्थिती पूर्वपदावर येऊन शांतता नांदावी, यासाठी सर्व राजकीय पक्ष व जनतेने एकत्रितरीत्या प्रयत्न करावेत, असे आवाहनही खा. दानवे यांनी केले. कचऱ्यावरून शहरात दंगल, नळ कनेक्शन कापण्यावरून दंगल होते. सर्व दंगलीचा केंद्रबिंदू महापालिकाच का? या प्रश्नालाही दानवे यांनी बगल दिली. यावेळी आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी नगरसेवक अनिल मकरिये उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारraosaheb danveरावसाहेब दानवेAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस