शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Aurangabad Violence : एमआयएम नेत्यांच्या पाहणीमुळे तणावात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:24 IST

जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली.

औरंगाबाद : जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली. पोलिसांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. एमआयएम नेते, कार्यकर्त्यांचा ‘काफिला’ निघून गेल्यावर राजाबाजार भागात प्रचंड तणाव निर्माण झाला.

पोलिसांसमक्ष जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन होत असताना पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल दंगलीत होरपळलेल्या नागरिकांनी केला. रविवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजाबाजार परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी लोकशाही पद्धतीने आपल्या भावनांना नेत्यांसमोर वाट मोकळी करून दिली.

यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहागंज चमनमार्गे एमआयएम नेते संस्थान गणपती येथे पोहोचले. त्यांच्यासोबत किमान शंभरांहून अधिक कार्यकर्ते होते. राजाबाजार भागात आल्यावर दंगलीत होरपळलेल्या नागरिकांनी त्यांना फारसा विरोध केला नाही. ते निघून गेल्यावर राजाबाजारमधील तरुणाई अधिक संतप्त झाली.

पोलिसांसमोरच कायदा अशा पद्धतीने वेशीवर टाकला जात असेल तर आम्हीही याच पद्धतीने उत्तर देऊ, असे तरुणाईचे म्हणणे होते. जमाव बंदी आदेश लागू असताना शंभर जणांचे टोळके येथे येत असताना पोलिसांनी का अडविले नाही, असा प्रश्नही नागरिकांनी केला. पोलीस राजाबाजार भागात सकाळपासूनच पंचनामे करण्यात मग्न आहेत. त्यांचे काम सुरू असतानाही एमआयएम नेते पंचनामे करा, असा आदेश कसा काय देतात.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliticsराजकारण