शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Aurangabad Violence : एमआयएम नेत्यांच्या पाहणीमुळे तणावात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:24 IST

जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली.

औरंगाबाद : जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली. पोलिसांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. एमआयएम नेते, कार्यकर्त्यांचा ‘काफिला’ निघून गेल्यावर राजाबाजार भागात प्रचंड तणाव निर्माण झाला.

पोलिसांसमक्ष जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन होत असताना पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल दंगलीत होरपळलेल्या नागरिकांनी केला. रविवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजाबाजार परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी लोकशाही पद्धतीने आपल्या भावनांना नेत्यांसमोर वाट मोकळी करून दिली.

यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहागंज चमनमार्गे एमआयएम नेते संस्थान गणपती येथे पोहोचले. त्यांच्यासोबत किमान शंभरांहून अधिक कार्यकर्ते होते. राजाबाजार भागात आल्यावर दंगलीत होरपळलेल्या नागरिकांनी त्यांना फारसा विरोध केला नाही. ते निघून गेल्यावर राजाबाजारमधील तरुणाई अधिक संतप्त झाली.

पोलिसांसमोरच कायदा अशा पद्धतीने वेशीवर टाकला जात असेल तर आम्हीही याच पद्धतीने उत्तर देऊ, असे तरुणाईचे म्हणणे होते. जमाव बंदी आदेश लागू असताना शंभर जणांचे टोळके येथे येत असताना पोलिसांनी का अडविले नाही, असा प्रश्नही नागरिकांनी केला. पोलीस राजाबाजार भागात सकाळपासूनच पंचनामे करण्यात मग्न आहेत. त्यांचे काम सुरू असतानाही एमआयएम नेते पंचनामे करा, असा आदेश कसा काय देतात.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliticsराजकारण