शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

Aurangabad Violence : 'त्या' परिसरात दरवळला अत्तराचा सुगंध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:04 IST

शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये अत्तर, अगरबत्तीची दुकाने होती. दंगलीत ही इमारतच पेटवून देण्यात आली.

औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये अत्तर, अगरबत्तीची दुकाने होती. दंगलीत ही इमारतच पेटवून देण्यात आली. या इमारतीतून आगीचे निखारे सतत फुलत होते. यातही वाऱ्याची झुळक येताच सुगंधाची लहर येत होती. ही लहर येताच येणारे-जाणारे हळहळ व्यक्त करीत पुढे निघून जात होते.

कोणत्याही दंगलीला जात, धर्म नसतो. दंगलखोरी ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या तडाख्यातून विरोधकांसह स्वकीयही सुटत नसतात. हा नियम आहे. याच नियमाप्रमाणे राजाबाजारातील शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराशेजारी १०० वर्षे जुनी इमारत होती. ही इमारत शहरातील अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांतील मोठ्या घटनांची साक्षीदार आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर माजी नगराध्यक्ष कै. बजरंगलाल शर्मा यांचे कुटुंब राहत होते, तर तळमजल्यात म्हैसूर सुगंध भांडार, माय चॉईस अगरबत्ती ही दुकाने होती. या दोन्ही दुकानांत सुंगध देणाऱ्या वास्तूंची विक्री होत असे. यातील म्हैसूर सुगंध भांडारमधील अत्तर शहरात प्रसिद्ध होते. 

अत्तराचे अनेक शौकीन नागरिक या ठिकाणाहून वेगवेगळ्या सुगंधी अत्तराची खरेदी करीत असत, तर माय चॉईस अगरबत्तीच्या दुकानातही वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती ठेवण्यात आलेल्या होत्या. दंगलखोरांनी ही इमारतच शुक्रवारी मध्यरात्री पेटवून दिली. या इमारतीचा बहुतांश भाग हा सागवान लाकडाचा असल्यामुळे आगीत तात्काळ कोसळला, तर अग्निशामक दलाच्या जवानांना पेटलेली लाकडे विझविण्यात यश आले होते. मात्र, इमारत कोसळल्यामुळे अत्तर, अगरबत्तीचे दुकान उद्ध्वस्त झाले. 

शुक्रवारच्या मध्यरात्री पेटवलेल्या या इमारतीमधून रविवारीही वाऱ्याची झुळूक येताच निखारे उडत होते. या जळत्या निखाऱ्यातूनही सुगंधी लहर येत होती. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना हा सुगंध सुखावत होता. मात्र, या दुकानाकडे पाहताच उद्ध्वस्त झालेल्या इमारतीची जळालेली लाकडे, पत्रे दिसत होती.

गुण्यागोविंदाने नांदत होतो...हिंदू-मुस्लिम असा दंगलीला धार्मिक रंग देण्यात येत आहे. माझ्या इमारतीमध्ये हिंदू, मुसलमान, शीख अशा सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपला व्यापार भला अन् आपण. सर्वजण एकमेकांच्या ताटात जेवण करतात. आमच्यात कधीही वाद झाले नाहीत. मात्र, दंगलीत हिंदू, मुस्लिम, शिखांची दुकाने पेटवली. या दंगलखोरांना कोणतीही जात, धर्म नव्हता, अशी भावनिक प्रतिक्रिया शहागंज कॉर्नरवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीमधील रहिवासी सतीश चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसshahaganjशहागंज