शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Aurangabad Violence : पोलीस निरीक्षक हाश्मी यांची दंगलीच्या दिवशीची भूमिका तपासली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:36 IST

जिन्सी ठाण्याच्या हद्दीतील नवाबपुरा येथून हे दंगलखोर रात्रभर पोलिसांवर दगडफेक करीत होते. कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी त्या रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि नियंत्रण कक्षाला दंगलखोरांविषयी अचूक माहिती न दिल्याने दंगल चिघळली, अशा अनेक तक्रारी आल्याने त्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

औरंगाबाद : जिन्सी ठाण्याच्या हद्दीतील नवाबपुरा येथून हे दंगलखोर रात्रभर पोलिसांवर दगडफेक करीत होते. कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी त्या रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि नियंत्रण कक्षाला दंगलखोरांविषयी अचूक माहिती न दिल्याने दंगल चिघळली, अशा अनेक तक्रारी आल्याने त्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

११ मे रोजी रात्री गांधीनगर येथे झालेल्या किरकोळ भांडणानंतर नवाबपुऱ्यातून मोठा जमाव चाल करून आला. जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक जखमी झाले. विरुद्ध बाजूने राजाबाजार येथे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, एसआरपीचे जवान आणि अन्य पोलीस अधिकारी-कर्मचारी दंगलखोरांना रोखण्यासाठी रात्रभर प्रयत्न करीत होते. नवाबपुरा येथील दंगलखोर ऐकत नसल्याचे पाहून  पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला आणि अनेक दंगलखोर जखमी झाले. 

दंगलखोरांनी वीजपुरवठा बंद केल्याने दंगलखोरांची संख्या किती आहे, याबाबतची माहितीही पोलिसांना मिळत नव्हती. नवाबपुरा एरिया जिन्सी पोलीस  ठाण्याच्या हद्दीत येतो. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक फईम हाश्मी हे त्या रात्री कर्तव्यावर होते. दंगलखोरांना रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. दंगलखोरांना रोखण्यासाठी अतिरिक्त कुमकही ते मागवू शकत होते. मात्र, त्यांनी नवाबपुरा येथील दंगलखोरांची संख्या किती आहे, त्यांना रोखण्यासाठी जिन्सी पोलीस काय करीत आहेत, याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली नाही. परिणामी, दंगलखोर रात्रभर पोलिसांवर दगडफेक करीत होते, अशा तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पो.नि. हाश्मी यांची दंगलीच्या दिवशीची भूमिका तपासली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारPoliceपोलिस