शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : 'त्या' रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी होते रान मोकळे; पोलिसांची भूमिका संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:48 IST

हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही.

ठळक मुद्देशुक्रवारी रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी पोलिसांनी रान मोकळे करून दिले होते. पोलिसांच्या संयमाचा अतिरेक समाजकंटकांनी केला.

औरंगाबाद : हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही. शुक्रवारी रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी पोलिसांनी रान मोकळे करून दिले होते. पोलिसांच्या संयमाचा अतिरेक समाजकंटकांनी केला.

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामाऱ्या झाल्यास पोलीस दोघांना नोटीस देऊन पायबंद घालतात. पोलीस दप्तरी हा साधा सोपा नियम आहे. नंतर या गटांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करून मोकळे होतात. शहागंज भागात हातगाड्या हटविणे त्यांना मारहाण करण्याचे काम एका गटाने केले. दुसऱ्या गटाने या कृतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारही केली. यानंतरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नाही. पोलिसांनी या घटनेत नेमकी बघ्याची भूमिका का घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

शुक्रवारी रात्री मोतीकारंजा भागात तोडफोड सुरू झाली. या तोडफोडीनंतर रात्री १२ ते ३ यावेळेत समाजकंटक शहागंज, सिटीचौक, नवाबपुरा, जिन्सी, राजाबाजार, गुलमंडीकडे सैरावैरा पळत होते. रस्त्यावर असलेल्या वाहनांना पोलिसांसमक्ष आग लावण्यात येत होती. या समाजकंटकांना लाठीचार्जद्वारे रोखण्याचे काम पोलिसांनी अजिबात केले नाही. तब्बल तीन तास समाजकंटकांना पोलिसांनी वाट मोकळी करून दिली होती. तीन तासांमध्ये मोठ्या प्रमाणात कुमक मागवून जमावावर लाठीचार्ज करण्याचे धाडसही पोलिसांनी दाखविले नाही.

रात्री ३.३० वाजता थेट गोळीबारच सुरू करण्यात आला. या गोळीबाळात १७ वर्षीय निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला. मयत तरुणाच्या घरात एसआरपीची तुकडी शिरते आणि संबंधित कुटुंबियांना तलवारी कोठे ठेवल्या का असे म्हणून धमकावते. दुसऱ्या बाजूला टवाळखोरांनी घराला लावलेल्या आगीत एका ७२ वर्षीय अपंग व्यक्तीचा होरपळून मृत्यू होतो; परंतु पोलीस शांत बसतात. यालाच कायद्याचे रक्षक म्हणावे का...?

कायम पोलीस आयुक्त का नाहीत...मिटमिटा येथील दंगलीनंतर पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त शहराला मिळालेले नाहीत. शहराला कायमस्वरूपी आयुक्त का देण्यात आले नाहीत. जेव्हा शहर पेटत होते तेव्हा एकही वरिष्ठ अधिकारी शहरात नाही. परिस्थिती कशी हाताळावी याचे आदेश कोणी द्यावेत. दोन सहायक पोलीस आयुक्त आणि एका उपायुक्तावर शहर कसे सांभाळले जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसshahaganjशहागंज