शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

Aurangabad Violence : 'त्या' रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी होते रान मोकळे; पोलिसांची भूमिका संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:48 IST

हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही.

ठळक मुद्देशुक्रवारी रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी पोलिसांनी रान मोकळे करून दिले होते. पोलिसांच्या संयमाचा अतिरेक समाजकंटकांनी केला.

औरंगाबाद : हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही. शुक्रवारी रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत दंगेखोरांसाठी पोलिसांनी रान मोकळे करून दिले होते. पोलिसांच्या संयमाचा अतिरेक समाजकंटकांनी केला.

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामाऱ्या झाल्यास पोलीस दोघांना नोटीस देऊन पायबंद घालतात. पोलीस दप्तरी हा साधा सोपा नियम आहे. नंतर या गटांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करून मोकळे होतात. शहागंज भागात हातगाड्या हटविणे त्यांना मारहाण करण्याचे काम एका गटाने केले. दुसऱ्या गटाने या कृतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारही केली. यानंतरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नाही. पोलिसांनी या घटनेत नेमकी बघ्याची भूमिका का घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

शुक्रवारी रात्री मोतीकारंजा भागात तोडफोड सुरू झाली. या तोडफोडीनंतर रात्री १२ ते ३ यावेळेत समाजकंटक शहागंज, सिटीचौक, नवाबपुरा, जिन्सी, राजाबाजार, गुलमंडीकडे सैरावैरा पळत होते. रस्त्यावर असलेल्या वाहनांना पोलिसांसमक्ष आग लावण्यात येत होती. या समाजकंटकांना लाठीचार्जद्वारे रोखण्याचे काम पोलिसांनी अजिबात केले नाही. तब्बल तीन तास समाजकंटकांना पोलिसांनी वाट मोकळी करून दिली होती. तीन तासांमध्ये मोठ्या प्रमाणात कुमक मागवून जमावावर लाठीचार्ज करण्याचे धाडसही पोलिसांनी दाखविले नाही.

रात्री ३.३० वाजता थेट गोळीबारच सुरू करण्यात आला. या गोळीबाळात १७ वर्षीय निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला. मयत तरुणाच्या घरात एसआरपीची तुकडी शिरते आणि संबंधित कुटुंबियांना तलवारी कोठे ठेवल्या का असे म्हणून धमकावते. दुसऱ्या बाजूला टवाळखोरांनी घराला लावलेल्या आगीत एका ७२ वर्षीय अपंग व्यक्तीचा होरपळून मृत्यू होतो; परंतु पोलीस शांत बसतात. यालाच कायद्याचे रक्षक म्हणावे का...?

कायम पोलीस आयुक्त का नाहीत...मिटमिटा येथील दंगलीनंतर पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त शहराला मिळालेले नाहीत. शहराला कायमस्वरूपी आयुक्त का देण्यात आले नाहीत. जेव्हा शहर पेटत होते तेव्हा एकही वरिष्ठ अधिकारी शहरात नाही. परिस्थिती कशी हाताळावी याचे आदेश कोणी द्यावेत. दोन सहायक पोलीस आयुक्त आणि एका उपायुक्तावर शहर कसे सांभाळले जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसshahaganjशहागंज