शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : शहागंजच्या हातगाड्यांचे ‘गणित’ लाखोंमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:32 IST

शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती.

औरंगाबाद : शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती. हप्ता न देणाऱ्याला पोलीस यंत्रणा क्षणार्धात हाकलून लावत असे. शहागंजमध्ये किमान २०० हातगाड्या उभ्या राहतात. दररोज दहा हजार रुपये आणि महिना तीन लाख रुपये हप्ता वसुलीतून मिळत होते. या आर्थिक गणितामुळे राजकीय मंडळींच्या पोटात गोळा उठला. त्यांनीही यात वाटा मागितला. हप्ता जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत राजकीय व्यक्तीचे अलीकडेच खटके उडाले होते.

आजही असंख्य नागरिक खरेदीसाठी शहागंज भागात हमखास येतात. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या भागात पाय ठेवायलाही जागा नसते. प्रत्येक रस्त्यावर  विविध विक्रेते दिसून येतात. मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिक येथे फळ विक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. काही वर्षांपासून येथे हातगाडी लावण्यासाठी हप्ता वसुली सुरू झाली. सिटीचौक पोलिसांच्या आशीर्वादाने एक  व्यापारी सर्व हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये जमा करू लागला. ही रक्कम सायंकाळी पोलिसांना देण्यात येत होती. दोनशे हातगाड्यांप्रमाणे दिवसभराचे दहा हजार रुपये जमा होतात. महिना तीन लाख तर वर्षाला ३६ लाख रुपये जमा होत होते. हप्ता जमा करणाऱ्या व्यक्तीला या भागातील एका राजकीय व्यक्तीने बोलावून घेतले. वाटणीच्या मुद्यावरून दोघांमध्ये चांगलेच खटके उडाले. याच राजकीय व्यक्तीने चमनमधील चप्पल विक्रेत्यांनाही महिना भाडे माझ्याकडे जमा करा, मनपाकडे एक रुपयाही जमा करू नका, असा सल्ला दिला होता. हा सल्लाही व्यापाऱ्यांनी धुडकावून लावला होता.

दंगलीत टार्गेट कोण ?हातगाडीचालकांकडून दररोज हप्ता वसुली करणाऱ्या व्यक्तीचे फळाचे दुकान सर्वात अगोदर जाळले. त्यानंतर चमनमधील चप्पल मार्केटला दंगलीत आग लावण्यात आली. आग कोणी लावली, त्यामागे हेतू काय होता. हा पोलीस तपासाचा भाग असला तरी क्षुल्लक वाटणारी ५० रुपयांची हप्ता वसुली कोणासाठी... किती वर्षांपासून सुरू होती याचाही तपास झाला पाहिजे. यातील दोषींवरही तेवढीच कारवाई झाली पाहिजे. हप्ता वसुलीत मनपाचे अधिकारी, कर्मचारी असले तरी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliticsराजकारण