शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Aurangabad Violence : शहागंजच्या हातगाड्यांचे ‘गणित’ लाखोंमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:32 IST

शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती.

औरंगाबाद : शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती. हप्ता न देणाऱ्याला पोलीस यंत्रणा क्षणार्धात हाकलून लावत असे. शहागंजमध्ये किमान २०० हातगाड्या उभ्या राहतात. दररोज दहा हजार रुपये आणि महिना तीन लाख रुपये हप्ता वसुलीतून मिळत होते. या आर्थिक गणितामुळे राजकीय मंडळींच्या पोटात गोळा उठला. त्यांनीही यात वाटा मागितला. हप्ता जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत राजकीय व्यक्तीचे अलीकडेच खटके उडाले होते.

आजही असंख्य नागरिक खरेदीसाठी शहागंज भागात हमखास येतात. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या भागात पाय ठेवायलाही जागा नसते. प्रत्येक रस्त्यावर  विविध विक्रेते दिसून येतात. मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिक येथे फळ विक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. काही वर्षांपासून येथे हातगाडी लावण्यासाठी हप्ता वसुली सुरू झाली. सिटीचौक पोलिसांच्या आशीर्वादाने एक  व्यापारी सर्व हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये जमा करू लागला. ही रक्कम सायंकाळी पोलिसांना देण्यात येत होती. दोनशे हातगाड्यांप्रमाणे दिवसभराचे दहा हजार रुपये जमा होतात. महिना तीन लाख तर वर्षाला ३६ लाख रुपये जमा होत होते. हप्ता जमा करणाऱ्या व्यक्तीला या भागातील एका राजकीय व्यक्तीने बोलावून घेतले. वाटणीच्या मुद्यावरून दोघांमध्ये चांगलेच खटके उडाले. याच राजकीय व्यक्तीने चमनमधील चप्पल विक्रेत्यांनाही महिना भाडे माझ्याकडे जमा करा, मनपाकडे एक रुपयाही जमा करू नका, असा सल्ला दिला होता. हा सल्लाही व्यापाऱ्यांनी धुडकावून लावला होता.

दंगलीत टार्गेट कोण ?हातगाडीचालकांकडून दररोज हप्ता वसुली करणाऱ्या व्यक्तीचे फळाचे दुकान सर्वात अगोदर जाळले. त्यानंतर चमनमधील चप्पल मार्केटला दंगलीत आग लावण्यात आली. आग कोणी लावली, त्यामागे हेतू काय होता. हा पोलीस तपासाचा भाग असला तरी क्षुल्लक वाटणारी ५० रुपयांची हप्ता वसुली कोणासाठी... किती वर्षांपासून सुरू होती याचाही तपास झाला पाहिजे. यातील दोषींवरही तेवढीच कारवाई झाली पाहिजे. हप्ता वसुलीत मनपाचे अधिकारी, कर्मचारी असले तरी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliticsराजकारण