शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : शहागंजच्या हातगाड्यांचे ‘गणित’ लाखोंमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:32 IST

शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती.

औरंगाबाद : शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती. हप्ता न देणाऱ्याला पोलीस यंत्रणा क्षणार्धात हाकलून लावत असे. शहागंजमध्ये किमान २०० हातगाड्या उभ्या राहतात. दररोज दहा हजार रुपये आणि महिना तीन लाख रुपये हप्ता वसुलीतून मिळत होते. या आर्थिक गणितामुळे राजकीय मंडळींच्या पोटात गोळा उठला. त्यांनीही यात वाटा मागितला. हप्ता जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत राजकीय व्यक्तीचे अलीकडेच खटके उडाले होते.

आजही असंख्य नागरिक खरेदीसाठी शहागंज भागात हमखास येतात. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या भागात पाय ठेवायलाही जागा नसते. प्रत्येक रस्त्यावर  विविध विक्रेते दिसून येतात. मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिक येथे फळ विक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. काही वर्षांपासून येथे हातगाडी लावण्यासाठी हप्ता वसुली सुरू झाली. सिटीचौक पोलिसांच्या आशीर्वादाने एक  व्यापारी सर्व हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये जमा करू लागला. ही रक्कम सायंकाळी पोलिसांना देण्यात येत होती. दोनशे हातगाड्यांप्रमाणे दिवसभराचे दहा हजार रुपये जमा होतात. महिना तीन लाख तर वर्षाला ३६ लाख रुपये जमा होत होते. हप्ता जमा करणाऱ्या व्यक्तीला या भागातील एका राजकीय व्यक्तीने बोलावून घेतले. वाटणीच्या मुद्यावरून दोघांमध्ये चांगलेच खटके उडाले. याच राजकीय व्यक्तीने चमनमधील चप्पल विक्रेत्यांनाही महिना भाडे माझ्याकडे जमा करा, मनपाकडे एक रुपयाही जमा करू नका, असा सल्ला दिला होता. हा सल्लाही व्यापाऱ्यांनी धुडकावून लावला होता.

दंगलीत टार्गेट कोण ?हातगाडीचालकांकडून दररोज हप्ता वसुली करणाऱ्या व्यक्तीचे फळाचे दुकान सर्वात अगोदर जाळले. त्यानंतर चमनमधील चप्पल मार्केटला दंगलीत आग लावण्यात आली. आग कोणी लावली, त्यामागे हेतू काय होता. हा पोलीस तपासाचा भाग असला तरी क्षुल्लक वाटणारी ५० रुपयांची हप्ता वसुली कोणासाठी... किती वर्षांपासून सुरू होती याचाही तपास झाला पाहिजे. यातील दोषींवरही तेवढीच कारवाई झाली पाहिजे. हप्ता वसुलीत मनपाचे अधिकारी, कर्मचारी असले तरी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliticsराजकारण