शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

Aurangabad Violence : पोलिसांनी झाडल्या तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:11 IST

दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.  

औरंगाबाद : दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.  

शहरात ११ मे रोजी रात्री किरकोळ कारणावरून दंगलीला सुरुवात झाली.  मोतीकारंजा येथून सुरुवात झालेल्या दंगलीचे लोण राजाबाजार, नवाबपुरा, चेलीपुरा, शहागंज आणि चेलीपुरा, चंपा चौक, रोशनगेटपर्यंत गेले होते. ही दंगल आटोक्यात आण्यासाठी शहर पोलिसांच्या मदतीला एसआरपीच्या सात तुकड्या शहरात दाखल झाल्या होत्या. यापैकी प्रत्यक्षात चार कंपन्याच दंगलग्रस्त भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत. वारंवार आवाहन करूनही दंगलखोर ऐकत नसल्याने पोलिसांनी विविध ठिकाणी हवेतून गोळीबार केला. हवेतील गोळीबारानंतर जमाव हटत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी त्यांच्यावर प्लास्टिक बुलेटने गोळीबार केला. 

या गोळीबारात एका तरुणाचा नवाबपुरा चौकात मृत्यू झाला. याविषयी अधिक माहिती घेतली असता राज्य राखीव दलाच्या जवानांनी दंगलखोरांविरोधात मोर्चा सांभाळल्यापासून काल दुपारपर्यंत १९७ प्लॅस्टिक गोळ्या झाडल्या, तर शहर मुख्यालयातील पोलिसांनी ६४ गोळ्या झाडल्या. याशिवाय अश्रुधुराचे शेकडो नळकांडे पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांनी फोडले.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसFiringगोळीबार