शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या विद्यापीठाची शुक्रवारपासून ‘परीक्षा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 20:03 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना शुक्रवारपासून (दि.१०) सुुरुवात होत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना शुक्रवारपासून (दि.१०) सुुरुवात होत आहे. या परीक्षेला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तब्बल ३ लाख ५ हजार ४९४ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचा शुभारंभ ढिसाळ नियोजनाने झाला. परीक्षा केंद्रांचे योग्य नियोजन झाले नसल्यामुळे ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आली असून, युद्धपातळीवर हॉलतिकीटमध्ये बदल केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी किमान दोन महिन्यांपासून नियोजन करण्याची आवश्यकता असते. मात्र परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यामुळे योग्य पद्धतीने परीक्षा केंद्रांचे वाटप करण्यात आले नाही. चार दिवसांपूर्वी परीक्षा संचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर परीक्षाा केंद्रांचा आढावा घेताना ज्या महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी बसण्यासही जागा उपलब्ध नाही. अशा महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त विद्यार्थी देण्यात आले होते. तर ज्याठिकाणी सर्व सुविधा आहेत. त्या ठिकाणी अल्प प्रमाणात विद्यार्थी देण्यात आले. याचा परीणाम ऐनवेळी परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करावी लागली आहे. यामुळे तब्बल २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती परीक्षा संचालक डॉ. नेटके यांनी दिली.मिलिंद कला महाविद्यालयात जास्तीत जास्त ६०० ते ७०० विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. परंतु त्यांच्याकडे २३ विद्यार्थी देण्यात आले होते. याचा परिणाम तेथील प्राचार्यांनी परीक्षार्थींना बसण्यासाठी परीक्षा हॉलच उपलब्ध नसतील तर परीक्षा कशी घ्यायची? असा सवाल उपस्थित केल्यामुळे ऐनवेळी अनेक ठिकाणी बदल केले आहेत. या बदलामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट बदलले आहेत. हे बदलले हॉलतिकिट संंबंधित विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात पाठविण्यात आले असून, आॅनलाईनसूद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे पाठवली असून, तरीही आपत्कालिन व्यवस्था म्हणून महाविद्यालयांना अंडरटेकिंग लिहून घेत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे डॉ. नेटके म्हणाले.

...तर फर्निचर भाड्याने घ्याज्या महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी अतिरिक्त झाले असून, त्याठिकाणचे अतिरिक्त विद्यार्थी इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा परिणामही परीक्षा केंद्रावर झाला असल्यामुळे महाविद्यालयांना परीक्षेसाठी फर्निचार भाड्याने घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे डॉ. नेटके म्हणाले.

२१ परीक्षा केंद्रांमध्ये बदलविद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया पदवी परीक्षांच्या केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी संख्या अतिरिक्त होत असल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रामध्ये बदल केला आहे. या संबंधित अपडेट माहिती संबंधित महाविद्यालये, विद्यापीठाची वेबसाईट आणि परीक्षा केंद्रांवर देण्यात आली आहे. याशिवाय बदल केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती सूद्धा एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना पाठवली असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले.

२२४ केंद्रांवर होणार परीक्षाविद्यापीठाच्या पदवी परीक्षा तब्बल २२४ केंद्रांवर होणार आहेत. यात औरंगाबद शहरात ३२, औरंगाबाद ग्रामीणमध्ये ४८, जालना शहर १२, जालना ग्रामीण ३४, बीड शहर १०, बीड ग्रामीण ५१, उस्मानाबाद शहर ९ आणि उस्मानाबाद ग्रामीणमध्ये २८ परीक्षा केंद्र असणार आहेत. या परीक्षात कॉपीमुक्तसाठी १६ भरारी पथके, २२४ सहकेंद्र प्रमख नेमण्यात आले आहेत.

अशी असणार परीक्षार्थींची संख्याअभ्यासक्रम विद्यार्थी

बी.ए. १,०९,०६१

बी.एस्सी १,०८,३१६

बी. कॉम. ५८,३३५

बीसीएसव इतर २९,७८२

--------------------------

एकुण ३,०५,४९४

पुर्वी असलेल्या परीक्षा संचालकांनी परीक्षेची तयारीच केली नव्हती. माझ्याकडे चार दिवसांपूर्वी पदभार देण्यात आला आहे. पहिल्या नियोजनात थोडी गडबड होती. ती दुरुस्त केली आहे. पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांची त्रास होऊ शकतो. मात्र हा त्रास होऊ नये, यासाठी सर्व परीक्षा केंद्रांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत.

- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक

टॅग्स :universityविद्यापीठ