शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबाद लोकसभेसाठीचे दोन इच्छुक शांतिगिरी महाराज व भापकर एकाच व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:02 IST

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शिक्षण, सिंचन, कृषी क्षेत्राची आवड आहे. भापकरी छाप पाडण्याचे काम ते या क्षेत्रात करतील. भापकर हजार पट मोठे व्हावेत. समाजाची व जनता ‘जनार्दना’ची सेवा त्यांच्या हातून व्हावी, अशी स्तुतिसुमने शांतीगिरी महाराज यांनी डॉ. भापकर यांच्याविषयी मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात उधळली. महाराजांनी डॉ. भापकरांची सूचक वक्तव्याप्रमाणे केलेली स्तुती खूप काही सांगून गेली. 

ठळक मुद्देभाजप आणि संघाची छाप असलेला हा मेळावा चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

औरंगाबाद : विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शिक्षण, सिंचन, कृषी क्षेत्राची आवड आहे. भापकरी छाप पाडण्याचे काम ते या क्षेत्रात करतील. भापकर हजार पट मोठे व्हावेत. समाजाची व जनता ‘जनार्दना’ची सेवा त्यांच्या हातून व्हावी, अशी स्तुतिसुमने शांतीगिरी महाराज यांनी डॉ. भापकर यांच्याविषयी मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात उधळली. महाराजांनी डॉ. भापकरांची सूचक वक्तव्याप्रमाणे केलेली स्तुती खूप काही सांगून गेली. 

भाजप आणि संघाची छाप असलेला हा मेळावा चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शांतीगिरी महाराज आणि डॉ. भापकर हे दोघेही एकाच व्यासपीठावर राज्यात सरकारच्या योजना प्रचार-प्रसार करण्याचे काम करणार्‍या संस्थेबरोबर आल्यामुळे दोघांपैकी एक भाजपचा उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या महिन्यात शांतीगिरी महाराजांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतल्यानंतर ते जाहीरपणे एखाद्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येण्याची पहिली घटना आहे, तर काही महिन्यांपासून डॉ. भापकर हे भाजपचे उमदेवार असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. डॉ. भापकर आगामी काळात जनतेची सेवा करतील की ‘जनार्दना’ची हे आगामी काळात समोर येईल. मेळाव्यात उद्योजक तथा सीआयआयचे अध्यक्ष ऋषी बागला, धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी एनजीओंना मार्गदर्शन केले. यावेळी विजय उक्कलगावकर, रा.स्वं. संघाचे प्रांत संघचालक अ‍ॅड. गंगाधर पवार, डॉ. प्रदीप देशपांडे, डॉ. शिरीष कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, उद्योजक श्रीराम नारायण, डॉ. अनंत पंढरे, डॉ. प्रसन्न पाटील आदींची उपस्थिती होती. दिवाकर कुलकर्णी यांनी आभार मानले. मेळाव्यात विभागातील १२० एनजीओंनी सहभाग नोंदविला. 

भापकरांची अशी रणधुमाळीडॉ. भापकरांनी मार्गदर्शन करताना प्रचार रणधुमाळी सुरू केल्याप्रमाणे मराठवाड्यात एक वर्षापूर्वी प्रशासकीय कामांची काय अवस्था होती आणि आता सद्य:स्थिती काय आहे, याचा पाढा वाचला. शांतीगिरी महाराजांच्या स्तुतीला साजेशी उत्तरे देताना ते म्हणाले, सर्वांना एकत्र आणणे महत्त्वाचे आहे. २३ पैकी ११ लाख शौचालये १ वर्षांत बांधली. सचिव असताना मनरेगाची अनेक कामे केली. २२ हजार शेततळे मंजूर केली. २५ हजार शेततेळ मार्चपर्यंत देण्याची तयारी आहे. ४ हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी ‘उभारी’ योजना आणली. जायकवाडी भरल्यामुळे रबी, खरिपासाठी ४ पाळ्या पाणी देण्याची संधी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपा