शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

औरंगाबाद संपूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; जिल्हाधिकारी चव्हाण यांचे स्पष्ट मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:02 IST

Lockdown in Aurangabad तारीख निश्चितपणे सांगता येणार नाही, पण लॉकडाऊनचा निर्णय होणारच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचीही लॉकडाऊन करण्याबाबत सूचना पालकमंत्री सुभाष देसाई लवकरच संपूर्ण लॉकडाऊनबाबत घेणार निर्णय

औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केले असून, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनीही तसे संकेत दिले आहेत. दुसरीकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता, लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनबाबत सूचना आलेली आहे. आरोग्य विभागासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. शहरात १०० टक्के लॉकडाऊन लागणार आहे. याचा निर्णय लवकरच होणार आहे. तारीख निश्चितपणे सांगता येणार नाही, पण लॉकडाऊनचा निर्णय होणारच आहे. पालकमंत्री देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री देसाई म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन केलेले आहे; परंतु आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पाऊल उचला, अशा सूचना आहेत. नांदेड, परभणी, बीडमध्ये लॉकडाऊन केलेले आहे. औरंगाबादमध्ये रोज दीड हजार रुग्ण सापडत आहेत. रुग्णवाढीचा वेग वाढतो आहे. ४ एप्रिल हा एक टप्पा आरोग्य विभागाने दाखविला आहे. त्यावेळी आताच्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण वाढत गेले, तर ते अडचणीचे ठरू शकेल. त्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा, अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत.

आरोग्याला प्राधान्यलॉकडाऊनमुळे मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रावर आणखी परिणाम होईल, याकडे लक्ष वेधले असता देसाई म्हणाले, प्राधान्य आरोग्याला दिले जाईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तत्पूर्वी जनतेचे जीवन सुरक्षित करण्याला पर्याय नाही.

लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झालेली चर्चा अशी...दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आ. अंबादास दानवे यांनी, आगामी होळी आणि रंगपंचमी गर्दी करून साजरी न करण्याबाबत, तसेच जिल्ह्यात आंदोलने, मोर्चे यावर बंदी घालण्याबाबत सूचना केली. आ. प्रदीप जैस्वाल यांनी, रुग्णालये नसलेल्या आवारातील मेडिकल दुकाने बंद करण्याबाबत सूचना पालकमंत्र्यांकडे केली. आ. सतीश चव्हाण यांनी, जिल्ह्यात कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात उपलब्ध बेड्‌सची माहिती देण्याबाबत सूचना केली. त्याचप्रमाणे जर लॉकडाऊनचा पर्याय निवडला, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी शिवभोजन थाळीचा पर्याय उपलब्ध ठेवावा, असेही चव्हाण म्हणाले. लोकप्रतिनिधींच्या कोरोनाबाबत आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या, अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या, विविध रुग्णालयांत उपलब्ध असलेली बेड्‌सची संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयु बेड्‌सची संख्या, कोरोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद