शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

औरंगाबाद @ ४२.३ अंश सेल्शिअस : यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 13:22 IST

उन्हाची दाहकता वाढत असल्याने नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देप्रदूषणाची पातळी घटूनही तापमान वाढलेआगामी दिवसांत तापमानाचा पारा ४३ अंशांवर जाण्याचा अंदाज

औरंगाबाद : काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, रविवारी शहरात ४२.३ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली. वाढत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे. 

चिकलठाणा वेधशाळेत रविवारी (दि. २४) कमाल तापमान ४२.३ आणि किमान तापमान २८.८ अंश सेल्शिअस इतके नोंदविले गेले. शहरात शनिवारी ४२.२ अंश तापमान नोंदविले गेले होते. रविवारी तापमानामध्ये किंचित वाढ झाली. मे महिन्यात आतापर्यंत तापमान ४० ते ४१ अंशांदरम्यान नोंदविले गेले. गतवर्षीच्या तुलनेत मागील आठवडाभरात कमी तापमान राहिले. 

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांना यंदाच्या उन्हाळ्यात  घराबाहेर पडता येत नाही.   त्यात उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पसरतो. सायंकाळनंतरही प्रचंड उकाडा होता. तापमानाने औरंगाबादकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हापासून, उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी कूलर आणि पंखा वापरण्यासह दुपारच्या वेळी घरावर पाणी मारणे, असे वेगवेगळे  उपाय करण्यावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. 

उन्हाची दाहकता वाढणारआगामी आठवडाभर तापमान ४३ अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाची दाहकता वाढत असल्याने नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद