शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

औरंगाबाद :फ्रँचायजीसाठी यंत्रणेचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:09 IST

शहरात मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. वीज गळतीचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नाही. कर्मचारी काम करीत नाहीत, असा कांगावा करत हे शहर पुन्हा एकदा खाजगी भांडवलदाराच्या घशात (फ्रँचायजी) घालण्याचे षडयंत्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांचे आहे, असा आरोप वीज तांत्रिक कामगार संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देमहावितरणविरूद्ध संघटना आक्रमक : वसुली, देखभाल दुरुस्ती, गळती रोखण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. वीज गळतीचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नाही. कर्मचारी काम करीत नाहीत, असा कांगावा करत हे शहर पुन्हा एकदा खाजगी भांडवलदाराच्या घशात (फ्रँचायजी) घालण्याचे षडयंत्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांचे आहे, असा आरोप वीज तांत्रिक कामगार संघटनेने केला आहे.यासंदर्भात संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन ‘लोकमत’ प्रतिनिधीसोबत चर्चा करताना म्हणाले की, बुधवारी प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाच्या आवारात सभा घेतली. या सभेला श्रोते म्हणून औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील सुमारे हजारो अभियंते, अधिकारी व जनमित्रांना सक्तीने बोलावण्यात आले होते. वीज गळती रोखणे आणि थकबाकीच्या वसुलीबाबत वरिष्ठ अधिकाºयांनी अभियंते- कामगारांना उपदेश करायचे होते. त्यांचे मनोबल उंचावण्याची गरज होती; पण तसे न करता औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी कर्मचाºयांना तुम्ही जर संघटनांकडे जाल, तर तुमची वाट लावली जाईल, अशा धमक्या दिल्या. ही बाब आम्ही मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कानावर घालणार आहोत.दिवाळीनंतर ग्रामीण भागातून ३०० जनमित्र शहरात आणले व त्यांच्याकडे थकबाकी वसुलीची मोहीम सोपविण्यात आली. या जनमित्रांनी घरोघरी जाऊन थकबाकी वसूल तर केलीच, शिवाय १० ते १५ हजार पंचनामे केले. त्याचे पुढे काय झाले. मुख्य अभियंता किंवा अन्य यंत्रणेने थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची कोणती भूमिका घेतली. वसुलीचे काम बºयापैकी झालेले असतानाही, तरीही थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असा कांगावा केला जातो. हे शहर पुन्हा एकदा फ्रँचायजीकडे सोपवून कर्मचारी व सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा यांचा छुपा अजेंडा आहे, असा आरोपही जहिरोद्दीन यांनी केला. काल दिवसभर १ हजार जनमित्र बसून ठेवले. त्यांना पिण्यासाठी पाणीदेखील दिले नाही. पाणी पिण्यासाठी जनमित्र हे विश्रामगृहात जात होते तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकांनी जाऊ दिले नाही. व्यवस्थापनाची जर अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असेही ते म्हणाले.बोललो नाही, तर कामे कशी होतीलयासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, फ्रँचायजी इथे यावी, असे आम्हाला तरी वाटते का, वर्षभरापासून वीजगळती व थकबाकी वसुलीसाठी वेगवेगळ्या मोहिमा राबविल्या; पण अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आम्ही काल वीज कर्मचारी, अभियंत्यांचा प्रादेशिक संचालकांच्या उपस्थितीत मेळावा घेतला होता. अपेक्षित वसुली झाली असती, वीजगळती कमी झाली असती, तर आम्हाला बोलण्याची गरजच नव्हती. आम्ही जर बोललोच नाही, रागावलो नाही, तर कामे कशी होतील. थोडेफार तर रागावलेच पाहिजे ना. फिल्डवर जेव्हा मला जाण्याची वेळ येते. जेव्हा वरिष्ठांकडून थकबाकी आणि वीजगळतीबाबत बोलणे खावे लागत असेल, तर मी काय करू. सातारा परिसरात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेला अहवाल जनमित्रांनी दिला. मी जेव्हा तेथे गेलो तर तीन ठिकाणी वीजपुरवठा सुरूअसल्याचे दिसले. जनमित्रांना प्रत्येक घराची माहिती असते. मग, त्यांना सांगितल्यानंतरही ते कठोर भूमिका का घेत नाहीत.चालू आर्थिक वर्षात अपेक्षित होती ५६ कोटी रुपयांची वसुलीगणेशकर म्हणाले,मार्च २०१७ पूर्वी १८० कोटी रुपयांची थकबाकी होती. ती आता ८० कोटींवर आली. याचा अर्थ १०० कोटी रुपयांची वसुली केली असा नव्हे. १०० कोटी रुपयांच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. तो पैसा खात्यात जमा झालेला नाही.एप्रिलपासून शहरात २६ कोटी आणि ग्रामीणचे २३ कोटी असे मिळून सुमारे ५६ कोटी रुपये वसूल करण्याची गरज आहे. आतापर्यंत ती झालेली नाही. आता केवळ दीड महिन्याचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या पाठीमागे लागावे लागणारच आहे.वीज गळतीचे प्रमाण ४०-४१ टक्क्यांवरून ३७-३८ टक्क्यांवर आले आहे. ही समाधानकारक परिस्थिती नाही. तरीही ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही त्यांच्यावर रागावलोही, तरी अभियंते- जनमित्र आमचेच आहेत. आम्ही एका परिवारातील आहोत. त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, हीच इच्छा आहे, असे गणेशकर म्हणाले.