शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानच्या पथकाकडून सोमवारी होणार औरंगाबादची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:08 IST

शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्‍यासाठी दाखल होणार आहे.

ठळक मुद्दे२६ ते २७ फेब्रुवारीला केंद्रीय पथक शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.मात्र, शहरात अचानक कचरा कोंडी निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांपासून मनपाला शहरातील कचरा उचलता आलेला नाही.

औरंगाबाद : शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्‍यासाठी दाखल होणार आहे. शहराची ही बकाल अवस्था पाहता सर्वेक्षणात महापालिका ‘नापास’होण्याची दाट शक्यता आहे.

२६ ते २७ फेब्रुवारीला केंद्रीय पथक शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ४ हजार गुणांची स्पर्धा आहे. स्पर्धेत देशभरातील सुमारे ४ हजार ४१ शहरे सहभागी होत आहेत. राज्यातील नगर परिषदा, महापालिका मिळून २६५ शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाली आहेत. केंद्र शासनाने नेमलेल्या कार्वी नामक एजन्सी यंदा सर्वेक्षणाचे काम करीत आहे. या एजन्सीचे किमान तीन अधिकार्‍यांचे पथक दोन दिवस शहरात स्वच्छतेच्या कामांची व विविध उपक्रमांची पाहणी करणार आहे. मनपाने सर्वेक्षणाशी संबंधित सर्व तयारी केली आहे. कागदोपत्री अहवाल तयार केलेला आहे. मात्र, शहरात अचानक कचरा कोंडी निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांपासून मनपाला शहरातील कचरा उचलता आलेला नाही. अनेक वसाहतींमध्ये कचर्‍याचे डोंगर साचले आहेत. 

आज पालकमंत्री कचरा प्रश्नावर तोडगा काढणार आहेत. कचरा कोंडी फुटली नाही तर मनपाच्या सर्वेक्षणावर याचा परिणाम होणार आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहराचा २९९ वा क्रमांक आला होता. २०१६ मध्ये औरंगाबाद शहर ५६ व्या क्रमांकावर होते. स्वच्छ  सर्वेक्षणातील प्रमुख भाग असलेल्या स्वच्छता अ‍ॅपचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला तीन वेळा मुदतवाढ मिळाली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका