शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

औरंगाबादेत खतांची साठेबाजी कृषिमंत्र्यांनी आणली चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:46 IST

या प्रकारामुळे औरंगाबादेत खतांची साठेबाजी करणा-या आणि चढ्या भावात बियाणे विकणाºया व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : खतांची साठेबाजी होत असल्याचा, तसेच चढ्या भावात विक्री होत असल्याचा प्रकार कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी स्वत: स्टिंंग आॅपरेशन करून उघडकीस आणला. यासाठी कृषिमंत्री चक्क शेतकऱ्याच्या वेशात गेले. येथील जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्समध्ये होत असलेल्या साठेबाजीचा प्रकार त्यांनी समोर आणला. या प्रकारामुळे औरंगाबादेत खतांची साठेबाजी करणा-या आणि चढ्या भावात बियाणे विकणाºया व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.जाधववाडीतील नवीनकुमार पाटणी यांच्या नवभारत फर्टिलायझर्ससह काही खते, बियाणे विक्रेत्यांबाबत शेतकºयांनी फोनवर दादा भुसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे रविवारी बीडला जाताना जाधववाडी येथील खतविक्री केंद्राची तपासणी केली. या दुकानात रासायनिक खते मिळत नसल्याच्या, तसेच युरिया जर पाहिजे असेल तर दुसरी खते व सोबत बियाणे विकत घ्यावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच चढ्या दराने खतांची विक्री होत असल्याच्याही तक्रारी होत्या. त्यावरून नवभारत फर्टिलायझर्स येथे दादा भुसे हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतकºयाच्या वेशात एका शेतकºयासोबत दुचाकीवर गेले. दुकानात गेल्यावर कृषिमंत्र्यांनी दहा खताच्या गोण्या विनंतीपूर्वक मागितल्या. दुकानदाराने त्यांना नकार दिला. मग त्यांनी पाच गोण्या मागितल्या.विक्रेत्याने खत नसल्याचे सांगितले. मग बोर्डवर तर स्टॉक असल्याचे दिसत आहे, मग तुम्ही स्टॉक नाही असे का सांगत आहात, असा प्रश्न भुसे यांनी विचारला. शेतकºयाच्या वेशातील भुसे यांनी मग स्टॉकचे रजिस्टर मागितले. विक्रेत्याने रजिस्टर घरी असल्याचे सांगितले. ३०० रुपयांपेक्षा जास्त भावाने खत मिळेल, असेही विक्रेत्याने सांगितले. त्यावरून खतविक्रीत घोळ होत असल्याचे लक्षात येताच भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकाºयांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.>१,३८६ खतांच्या गोण्यानवभारत फर्टिलायझर्सचे मालक पाटणी यांची सहा ते सात गोदामे तपासल्यानंतर १,३८६ गोण्या स्टॉकमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.सक्तीच्या रजेवरस्वत: कृषिमंत्र्यांना येऊन छापा टाकावा लागला. त्यामुळे जिल्हा कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी संशयाच्या भोवºयात आले आहेत. शेतकºयांच्या तक्रारी येताच गुण व नियंत्रक अधिकाºयाने दुकानाची तपासणी करणे गरजेचे होते; परंतु त्याने तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याला सक्तीच्या रजेवर पाठविले.>मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्याचा दौरा करीत आहे. आता बीडमध्ये जात आहे. आढावा बैठक ज्या दिवशी होती, त्याच दिवशी तक्रारीनुसार कारवाई करणार होतो; परंतु त्यादिवशी बैठक जालन्याला झाल्यामुळे काही करता आले नव्हते. आता ताफा लांबवर उभा करून शेतकºयाच्या वेशात खताची साठेबाजी चव्हाट्यावर आणली. - दादा भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र