शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

औरंगाबादमध्ये २२५० ग्राहकांची वीज कापली; एका दिवसात झाली २ कोटीची वसुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 13:33 IST

महावितरणने थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे.

ठळक मुद्देथकबाकी वसुलीसाठी मुख्य अभियंता रस्त्यावरमोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

औरंगाबाद : महावितरणने थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. वसुलीसाठी या मोहिमेत शनिवारी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले. दरम्यान, औरंगाबाद परिमंडळातील २ हजार २७० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याचबरोबर शनिवारी एकाच दिवशी दोन कोटींहून अधिक वसुली झाली. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांत थकीत वीजबिलांचे प्रमाण जास्त आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे स्वत: शनिवारी मोहिमेत सहभागी झाले. त्यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय अभियंत्यांनी वसुली व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविली. 

मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी जालना शहरात २० व्यावसायिक व ५ औद्योगिक थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर थकीत वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला.थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहिल. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

एकाच दिवशी २ कोटी १८ लाख ३६ हजार रुपये वसूलऔरंगाबाद शहर मंडळात ४४६, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १३०७, तर जालना मंडळात ५१७ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या मोहिमेत एका दिवसात औरंगाबाद शहर मंडळांतर्गत १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४४ रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत ५२ लाख ७४ हजार ९७० रुपये. तर जालना मंडळात ३२ लाख ८४ हजार १८२ रुपये वसूल झाले. औरंगाबाद परिमंडळांतर्गत एकूण २ कोटी १८ लाख ३६ हजार १९६ रुपये वसूल झाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल